उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:04+5:30

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर ६ ते ८ मार्च असे तीनदिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठही पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधून ७५२ मुले आणि १ हजार ४० मुली सहभागी झाल्या होत्या.

Forget about disposing of leftover food | उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा विसर

उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा विसर

ठळक मुद्देकंत्राटदाराचा निष्काळजीपणा : क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. मात्र, कॅटरर्स व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे या महोत्सवाला सरतेशेवटी गालबोट लागले. कॅटरर्स व्यावसायिकाडून परिसरातच फेकण्यात आलेले उरलेले उन्न व प्लास्टिकयुक्त कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला. परिणामी, रहिवासी नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर ६ ते ८ मार्च असे तीनदिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठही पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधून ७५२ मुले आणि १ हजार ४० मुली सहभागी झाल्या होत्या. तीन दिवसांच्या कालावधीत विविध ३० स्पर्धा घेण्यात आल्या. तीन दिवसीय या महोत्सवाकरिता अन्नपुरवठ्याचे कंत्राट नागपूर येथील विजय दहीकर यांच्या कॅटरर्सला देण्यात आले होते. या व्यावसायिकाने पुरविलेल्या अन्नाची गुणवत्ता हवी तशी नव्हती, असा आरोपही आयोजकांनी केला. कंत्राटदाराला दिलेल्या अन्नपुरवठा आदेशात स्वच्छता करण्याची बाब अंतर्भूत होती. असे असताना या कॅटरर्स व्यावसायिकाने कमालीचा हलगर्जीपणा केला. उरलेल्या अन्नाची व्यवस्थित विल्हेवाट न लावता बेशिस्तीचे दर्शन घडविले. शिळ्या अन्नासह पोती जुन्या तहसील कार्यालय परिसरात फेकून देण्यात आली.
संकुलातील नालीतही प्लास्टिक व इतर कचºयाचा खच पडलेला होता. व्यावसायिकाला उरलेल्या अन्नाची नीट विल्हेवाट लावण्यासह स्वच्छता करण्याचा विसर पडला. त्यामुळे सोमवारची पहाट उजाडताच वातावरण दुर्गंधीमय झाले होते. या शिळ्या अन्नावर जनावरे उच्छाद घालत असल्याचे दिसून आले. नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागला.

कंत्राटदाराला दिलेल्या अन्नपुरवठा आदेशात गुणवत्तापूर्ण अन्नपुरवठ्यासोबतच स्वच्छतेची बाब समाविष्ट होती. मात्र, या कंत्राटदाराने उरलेले अन्न परिसरातच फेकून दिले. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- सुरेश हजारे, शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. वर्धा.

परिसराच्या स्वच्छतेकरिता क्रीडा संकुलातील चौकीदाराला पैसे दिले होते. त्याने स्वच्छता केली नसावी.
- विजय दहीकर, कॅटरर्स व्यावसायिक, नागपूर.

 

Web Title: Forget about disposing of leftover food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.