शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

३० वर्षांपासून काँग्रेस झाली खिळखिळी, कम्युनिस्टांनी मोडली मक्तेदारी; नंतर भाजपाने बसवले बस्तान

By रवींद्र चांदेकर | Published: April 01, 2024 4:04 PM

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे.

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून

वर्धा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग नऊ वेळा विजय मिळविल्यानंतर १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढली होती. तेव्हापासून काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यानंतरच्या काळात भाजपाने प्रथम चंचू प्रवेश करून २०१४ पासून आपले बस्तान पक्के केले आहे.

पहिल्या १९५२ ते १९८९ च्या नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांनी सलग विजय मिळविला होता. १९९१ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसची ही मक्तेदारी मोडीत काढली. १९९६ मध्ये भाजपने येथे चंचू प्रवेश केला. नंतर आलटून पालटून काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला. १९९८, १९९९ मध्ये काँग्रेसने बाजी मारली खरी पण, २००४ मध्ये पुन्हा भाजपने मुसंडी मारली. २००९ मध्ये काँग्रेसने विजय मिळविला. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने आपले बस्तान पक्के केले.

१९९१ च्या निवडणुकीपासूनच काँग्रेस खिळखिळी होण्यास सुरुवात झाली होती. काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष, पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी, एकमेकांची जिरविण्याची प्रवृत्ती, नेतृत्वाचा ओसरलेला प्रभाव आदी कारणांमुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसवर अवकळा आली. कधी काळी काँग्रेसच्या चिन्हावर कुणीही उमेदवार असला तरी विजयी होत होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये निश्चिततेचे वातावरण होते. नेते निर्धास्त झाले होते. त्याचा फटका पक्षाला बसला अन् भाजपने आपले बस्तान पक्के केले. एवढा बदल होऊनही काँग्रेस नेते अद्याप ताळ्यावर आलेले दिसत नाही. उमेदवारीच्या भांडणात मतदारसंघ मित्र पक्षाला गेला तरी काँग्रेस नेते आपल्याच धुंदीत दिसत आहे. त्यामुळे यंदा प्रथमच काँग्रेसचा उमेदवार मैदानात राहणार नाही.दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की

आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार राहत होता. कधी हार, कधी जीत होत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या माजी आमदारावर मित्र पक्षाच्या चिन्हावर लढण्याची नामुष्की ओढवली आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटली. परिणामी काँग्रेस तूर्तास वर्धेच्या रिंगणातून बाद झाली आहे. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसवर ही नामुष्की ओढावल्याने महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या जिल्ह्यात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार नसणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस