ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवा
By Admin | Updated: December 10, 2014 23:03 IST2014-12-10T23:03:35+5:302014-12-10T23:03:35+5:30
ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी,

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवा
वर्धा : ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी, दुष्काळी स्थितीचा विचार करता शेतकऱ्यांच्या शेतातील कामे, रोजगार हमी योजनेत सामावून घ्यावी आदींसह अनेक मागण्यांचे निवेदन ग्रामरोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना सादर करण्यात आले.
ग्रामरोजगार सेवकांच्या अनेक समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच यासंदर्भात जॉब कार्डधारक मजुरांना २७२ रुपये बिज व्याजी कर्ज बँकेतून देण्यात यावे, अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने काम बंद आंदोलनाची सूचना देण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ डिसेंबर रोजी ग्रामरोजगार सेवक व जॉब कार्डधारक मजुरांचा मोर्चा काढला जाणार आहे.
निवेदन देताना शिष्टमंडळात प्रा. राजू गोरडे, रमेश जयसिंगपुरे, विनायक नन्नोरे, किशोर चिमुरकर, संतोष शिखरे, भिमराव ओंकार राजकुमार कांबळे, नितेश टेकाम, सुनील गावंडे, सुधाकर बोबडे, प्रदीप अळसापुरे, प्रकाश येळणे, विजय उईके, देवानंद पाटील, अशोक गोटे, नीलेश नाईक, सतीश गेडाम आदी उपस्थित होते.
या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच ग्रामरोजगार सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामरोजगार व आॅपरेटर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)