शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मिळणार पाचशे रुपये पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

शासनाने दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहे. परंतु या योजनांचा लाभ दिव्यांगापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना लाभाकरिता आंदोलन करावे लागतात. अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे‘झेडपी’ची योजना : जिल्हा परिषद अध्यक्षांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे. त्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेने दिव्यांगांना दरमहा पाचशे रुपये पेन्शन देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील असंख्य दिव्यांगांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून ही राज्यातील पहिली योजना असल्याचे सांगितले जात आहे.शासनाने दिव्यांगांसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहे. परंतु या योजनांचा लाभ दिव्यांगापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना लाभाकरिता आंदोलन करावे लागतात. अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली आहे.एकीकडे दिव्यांगाना योजनेचा लाभ मिळविण्याकरिता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी विदारक परिस्थिती आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना वार्षिक सहा हजार रुपये तर दरमहा पाचशे रुपये पेन्शन देण्याची योजनेला मूर्त रुप देण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत ही योजना २०१९-२० या वर्षांपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या योजनाच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेची ही पेन्शन योजना लाभदायक ठरणार आहे.६० टक्के दिव्यांगत्वाची अटदिव्यांग वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गत निराधार/निराश्रीत व अतिरिक्त दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे (पेन्शन स्किम) योजना जिल्हा परिषदेने सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता ६० टक्के दिव्यांगत्वाची अट ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्यावतीने ही योजना राबविली जाणार असल्याने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील निधी उपयोगात आणल्या जाणार आहे. यातील निधी शिल्लक राहिल्यास दिव्यांगात्वाची टक्केवारी काही प्रमाणात कमी केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सेस फंडातून समाज कल्याण विभागांतर्गत दिव्यांगांना दरमहा पाचशे रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये पेंशन दिले जाणार आहे. या योजनेच्या लाभाकरिता ६० टक्के दिव्यांगत्वाची अट ठेवण्यात आली आहे. या योजनेचा प्रतिसाद पाहून भविष्यात ही टक्केवारी आणखी कमी करुन दिव्यांग बांधवांना मदतीचा हात दिला जाईल.- नितीन मडावी, अध्यक्ष, जि.प.वर्धा.एका सर्कलमधून मागितली आठ लाभार्थ्यांचे नावेजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी ही योजना कार्यान्वीत करण्याबाबत विचार व्यक्त केला. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरी प्रदान केली. त्यामुळे ही योजना राबविण्याकरिता प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून आठ लाभार्थ्यांची नावे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे पाठविण्यात यावी, असे पत्र समाज कल्याण विभागाने सर्व जिल्हा परिषद सदस्यांना दिले आहे. आता जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारसीनुसार आलेल्या पत्रावर पुढील कार्यवाही होणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक