शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पाचशे क्विंटल सोयाबीन भिजले; अवकाळीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:07 IST

Wardha News Rain सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.

शेतकऱ्यांचा माल उघड्यावर, व्यापाvचा शेडमध्येलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: निसर्गकोपाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर पावसाचा मारा अद्यापही सुरुच आहे. मोठ्या मेहनतीने हाती आलेले थोडेथोडके सोयाबीन वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये विकण्यासाठी आणले असता सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला सोयाबीनची जोमात वाढ झाल्याने यंदा सोयाबीनचे उत्पन्न भरघोस होण्याची अनेकांना आशा होती. पण, सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सध्या एकरी तीन ते पाच पोत्यापर्यंत उतारा असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही भरुन निघणे कठीण आहे. दोन दिवसाच्या सुटीनंतर आणि सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकायला आणले होते. शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल साठवून असल्याने शेतकऱ्यांना उघड्यावरच आपला माल टाकावा लागला. अशातच दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन ओले झाले.यात काही मालाचा लिलाव झाला होता तर काही मालाचा लिलाव बाकी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या मालाचा लिलाव बाकी होता त्या शेतकऱ्यांना मात्र यार्डात सोयाबीन आल्यानंतरही नुकसानीचा सामना करावा लागला.

आता शेतमाल विक्रीला येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांच्या मालाकरिता तात्काळ शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.सहा एकरात सोयाबीनची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब घाल्याने २६ कट्टे सोयाबीन झाले. ते वाळल्यानंतर केवळ दहा कट्टेच सोयाबीन शिल्लक राहिले. ते विकण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये आणले असता आजच्या अवकाळी पावसाने ते पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे आणखीच अडचणीत भर पडली आहे.- गणपत पोटे, शेतकरी, इसापूर.

बाजार समितीमध्ये आलेल्या आजच्या मालाचा लिलाव झाला होऊन बऱ्याच मालाचा काटाही आटोपला होता. काही माल भरणे सुरु असतानाच पाऊस आल्याने जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल सोयाबीन ओले झाले. लिलाव प्रक्रिया आटोपल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले. येथील तीन शेड भाजीविक्रेत्यांना दिल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ते शेड खाली करुन द्यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

ओट्यांना शेडची प्रतीक्षाचबाजार समितीत कित्येक दिवसांपासून ओटे बांधण्यात आले आहे पण, त्यावर अद्यापही शेड उभारले नाहीत. येथील तीन शेड ठोक भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करुन दिले आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसाने त्यांचा कांदाही भिजला होता. सध्या असलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवला असून शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. बाजार समितीत व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर ही बाब नेहमीचीच असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती