शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

वर्धा जिल्ह्यात पाचशे क्विंटल सोयाबीन भिजले; अवकाळीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:07 IST

Wardha News Rain सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.

शेतकऱ्यांचा माल उघड्यावर, व्यापाvचा शेडमध्येलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: निसर्गकोपाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर पावसाचा मारा अद्यापही सुरुच आहे. मोठ्या मेहनतीने हाती आलेले थोडेथोडके सोयाबीन वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये विकण्यासाठी आणले असता सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने दणका दिलाच. अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पाचशे क्विंटलवर सोयाबीन ओले झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चांगलीच दाणादाण झाली.मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. सुरुवातीला सोयाबीनची जोमात वाढ झाल्याने यंदा सोयाबीनचे उत्पन्न भरघोस होण्याची अनेकांना आशा होती. पण, सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सध्या एकरी तीन ते पाच पोत्यापर्यंत उतारा असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही भरुन निघणे कठीण आहे. दोन दिवसाच्या सुटीनंतर आणि सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकायला आणले होते. शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल साठवून असल्याने शेतकऱ्यांना उघड्यावरच आपला माल टाकावा लागला. अशातच दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोयाबीन ओले झाले.यात काही मालाचा लिलाव झाला होता तर काही मालाचा लिलाव बाकी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ज्या मालाचा लिलाव बाकी होता त्या शेतकऱ्यांना मात्र यार्डात सोयाबीन आल्यानंतरही नुकसानीचा सामना करावा लागला.

आता शेतमाल विक्रीला येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांच्या मालाकरिता तात्काळ शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.सहा एकरात सोयाबीनची लागवड केली होती. अतिपावसाने पीक खराब घाल्याने २६ कट्टे सोयाबीन झाले. ते वाळल्यानंतर केवळ दहा कट्टेच सोयाबीन शिल्लक राहिले. ते विकण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये आणले असता आजच्या अवकाळी पावसाने ते पूर्णत: भिजले आहे. त्यामुळे आणखीच अडचणीत भर पडली आहे.- गणपत पोटे, शेतकरी, इसापूर.

बाजार समितीमध्ये आलेल्या आजच्या मालाचा लिलाव झाला होऊन बऱ्याच मालाचा काटाही आटोपला होता. काही माल भरणे सुरु असतानाच पाऊस आल्याने जवळपास दीडशे ते दोनशे क्विंटल सोयाबीन ओले झाले. लिलाव प्रक्रिया आटोपल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळले. येथील तीन शेड भाजीविक्रेत्यांना दिल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ते शेड खाली करुन द्यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.- समीर पेंडके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धा.

ओट्यांना शेडची प्रतीक्षाचबाजार समितीत कित्येक दिवसांपासून ओटे बांधण्यात आले आहे पण, त्यावर अद्यापही शेड उभारले नाहीत. येथील तीन शेड ठोक भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करुन दिले आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसाने त्यांचा कांदाही भिजला होता. सध्या असलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल ठेवला असून शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. बाजार समितीत व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर ही बाब नेहमीचीच असून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती