शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

शाळा बंद तरी पालकांच्या मोबाईलवर ‘फी’चे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:59 IST

शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देसंकट : लॉकडाऊनमुळे त्रस्त पालकांच्या अडचणींमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे शासनाने ठरवले असले तरी कोरोनाबाधितांमुळे व्यापलेले स्थानिक क्षेत्र पाहता ते वेळापत्रक याठिकाणी पाळले जाईल, याची खात्री जिल्हा प्रशासनालाही देता येत नाही. असे असले तरी शाळांनी मात्र आपले धूमशान सुरू केले असून, फी वसुलीसाठी पालकांना मोबाईलवर संदेश पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.त्यातच शाळांनी फी बाबतचे संदेश पाठवणे सुरू केल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे.काही शाळांनी दिलेल्या संदेशानुसार पालकांनी तातडीने शाळांशी संपर्क करून फी भरावी व आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे म्हटले आहे. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका पालकाने सांगितले, की शाळांनी सुरू केलेला हा तगादा पालकांना अजिबात आवडलेला नाही.कोरोनाचे संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत शाळा तरी कशी सुरू होणार, असा प्रश्न पालक करीत आहे. शिवाय यावर्षीचे एकूणच सत्र हे कमी कालावधीचे राहणार असल्याने शाळांनी पूर्ण फी का मागावी, असाही सूर पालकांकडून उमटत आहे.या आहेत पालकांच्या मागण्याशुल्क वसुलीबाबत शाळांनी तगादा लावू नये.शुल्क भरण्यासाठी टप्पे (किस्त) पाडून द्यावे.जेवढ्या कालावधीसाठी प्रत्यक्ष ज्ञानदान होणार आहे, त्याच कालावधीची फी आकारली जावी.कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी मागितली जाऊ नये.

टॅग्स :Schoolशाळा