शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

शाळा बंद तरी पालकांच्या मोबाईलवर ‘फी’चे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:59 IST

शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देसंकट : लॉकडाऊनमुळे त्रस्त पालकांच्या अडचणींमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे शासनाने ठरवले असले तरी कोरोनाबाधितांमुळे व्यापलेले स्थानिक क्षेत्र पाहता ते वेळापत्रक याठिकाणी पाळले जाईल, याची खात्री जिल्हा प्रशासनालाही देता येत नाही. असे असले तरी शाळांनी मात्र आपले धूमशान सुरू केले असून, फी वसुलीसाठी पालकांना मोबाईलवर संदेश पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.त्यातच शाळांनी फी बाबतचे संदेश पाठवणे सुरू केल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे.काही शाळांनी दिलेल्या संदेशानुसार पालकांनी तातडीने शाळांशी संपर्क करून फी भरावी व आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे म्हटले आहे. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका पालकाने सांगितले, की शाळांनी सुरू केलेला हा तगादा पालकांना अजिबात आवडलेला नाही.कोरोनाचे संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत शाळा तरी कशी सुरू होणार, असा प्रश्न पालक करीत आहे. शिवाय यावर्षीचे एकूणच सत्र हे कमी कालावधीचे राहणार असल्याने शाळांनी पूर्ण फी का मागावी, असाही सूर पालकांकडून उमटत आहे.या आहेत पालकांच्या मागण्याशुल्क वसुलीबाबत शाळांनी तगादा लावू नये.शुल्क भरण्यासाठी टप्पे (किस्त) पाडून द्यावे.जेवढ्या कालावधीसाठी प्रत्यक्ष ज्ञानदान होणार आहे, त्याच कालावधीची फी आकारली जावी.कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी मागितली जाऊ नये.

टॅग्स :Schoolशाळा