विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था प्रभावी होतेय
By Admin | Updated: December 11, 2014 23:13 IST2014-12-11T23:13:24+5:302014-12-11T23:13:24+5:30
संगणकाद्वारे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रभाव वाढत असून संरक्षण, रेल्वे, बांधकाम, विमानसेवा अशा विविध क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होताना दिसत आहे, असे मत प्रमुख उद्घाटक डॉ. निलकंठ पेंडसे यांनी

विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था प्रभावी होतेय
सेलू : संगणकाद्वारे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रभाव वाढत असून संरक्षण, रेल्वे, बांधकाम, विमानसेवा अशा विविध क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होताना दिसत आहे, असे मत प्रमुख उद्घाटक डॉ. निलकंठ पेंडसे यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणुकीवर राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी या माध्यमातून प्रकाश टाकला.
येथील यशवंत महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने ‘आर्थिक सुधारणेनंतर भारतातील विदेशी प्रत्यक्ष गुतवणूक व त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, कला वाणिज्य महाविद्यालय, कारंजा (घा.) चे प्राचार्य डॉ. संजय धनवटे, डॉ. इंदुरवाडे, प्राचार्य डॉ. किशोर अहेर समन्वयक प्रा. सतिश रघुवंशी उपस्थित होते.
डॉ. विलास देशमुख यांनी गुंतवणुकीसोबत सांस्कृतिक क्षेत्रात होणारा बदल भारतीय लोकांच्या भावी पिढीवर जास्त प्रतिकूल प्रभाव वाढवित आहे, असा खेद व्यक्त केला. डॉ. अहेर यांनी ही विदेशी गुंतवणूक आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे, पण यासोबत देशातील उद्योजकांना उत्पादकांना अधिक जास्त दक्षता बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा. सतिश रघुवंशी यांनी केले. संचालन प्रा. कृष्णा दीक्षित यांनी केले तर आभार प्रा. अनंत रिढे यांनी मानले.
चर्चासत्राच्या द्वितीय भागात विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. हरिदास धुर्वे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. करमसिंग राजपूरे उपस्थित होते. विदेशी गुंतवणुकीचा वाढता प्रभाव व त्याचे होणारे भावी परिणाम या अनुषंगाने विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. या सत्राचे संचालन प्रा. वसंत राठोड यांनी केले व प्रा. नरेंद्र जाधव यांनी आभार मानले.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रकाश नाथे होते. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुक टाळणे अशक्य आहे. याउलट स्पर्धेच्या युगात आपली उत्पादकता वाढविण्याला पर्याय नाही, असा सूर उमटला. संचालन डॉ. अर्चना फाळके यांनी केले तर प्रा. राजेंद्र मुंढे यांनी सर्वाचे आभार मानले. चर्चासत्रात सादर शोधनिबंधाची स्मरणिका काढली. यावेळी प्रा. भगत, प्रा. दिक्षीत, प्रा. फाळके, खोब्रागडे, हुमणे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)