शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

तिचे कौतुक करायला वडीलच हयात नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

सकाळी तीन तास आणि रात्री पाच तास असा तिचा नियमित अभ्यास असायचा. शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असे. विज्ञान, इंग्रजी व गणित हे तिचे आवडते विषय. गणितात शंभरपैकी ९८ आणि इंग्रजीत १०० पैकी ९३ गुण मिळाले. विज्ञानात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती पुनर्तपासणीसाठी बोर्डाकडे अर्ज सादर करणार आहे.

ठळक मुद्देगुणवंत विद्यार्थिनीची खंत : महिनाभरापूर्वीच वडिलांनी केली आत्महत्या

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेउरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील बेनोडा (माटोडा) या गावात माती कुडाच्या घरात राहून सतत आठ तास अभ्यास करून शिकवणी वर्गाविना ९२.६० टक्के गुण शेतकऱ्याच्या मुलीने मिळविले. सर्व स्तरावरूनच तिचे कौतुक झाले. मात्र, तोंड भरून मनापासून कौतुक करणारे वडीलल हयात नसल्याने तिचे डोळे पाणावले.निकिता सुखदेव तुमसरे रा. बेनोडा (माटोडा) असे या होतकरू मुलीचे नाव. तालुक्यातील नांदपूर येथील मॉडेल शाळेतील हुशार विद्यार्थिनी. वडिलांच्या कष्टाची, गरिबीची तिला जाणीव होती. सकाळी तीन तास आणि रात्री पाच तास असा तिचा नियमित अभ्यास असायचा. शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असे. विज्ञान, इंग्रजी व गणित हे तिचे आवडते विषय. गणितात शंभरपैकी ९८ आणि इंग्रजीत १०० पैकी ९३ गुण मिळाले. विज्ञानात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती पुनर्तपासणीसाठी बोर्डाकडे अर्ज सादर करणार आहे.झाले सुखदेवराव तुमसरे (४८) यांची साडेतीन एकर शेती आहे. लॉकडाऊनमध्ये शेतीसाठी त्यांनी हातउसने पैसे घेऊन कपाशीची पेरणी केली. बँकेचे कर्ज मिळाल्यावर सर्वांचे पैसे फेडू, असे त्यांनी ठरविले. त्यांचे मागील कर्ज माफ झाले होते. त्यांनी आर्वी येथील कोकण विदर्भ बँकेत कर्जासाठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र कर्जप्रकरण रद्द झाले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होते त्यामुळे. ३० जूनला आर्वी तालुक्यातील जळगाव येथे नातेवाईकाचा विवाह सोहळा असल्याने कुटुंबातील सदस्य जळगावला गेले. हीच संधी साधत त्यांनी घरीच कीटकनाशक प्राशन केले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथून उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी मुलांना आधार पाहिजे, तेव्हाच वडील गेलेत. आता आईचे पाठबळच मुलामुलींमागे मागे आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीStudentविद्यार्थी