शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

सायखेडा (ठाकरे) येथे वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:58 PM

नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात.

ठळक मुद्देपिकांची नासाडी : तक्रार व पंचनामे करून शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी थकले

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. दररोजच्या नुकसानाचे किती प्रस्ताव वनविभागाकडे सादर करावेत हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर दररोज किती शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करावेत हा प्रश्न वनविभागातील कर्मचाºयासमोर निर्माण झाला आहे.सायखेडा (ठाकरे) हे गाव वर्धा नदीकाठावर असून त्यांची शेतजमीन त्याच परिसरात आहे. धाखटी व उपजाऊ जमीन म्हणून हा भाग प्रसिध्द आहे. या जमिनीतील पिकांची उलंगवाडी लवकर होत नाही. यावर्षी इतर भागातील पिकांची उलंगवाडी होत असली तरी या परिसरातील पिके अजूनही भरीत आहेत. पिण्यासाठी पाणी व लपण्यासाठी नदी किनारी खोल दºया असल्याने जंगली श्वापदे व रोही या परिसरात स्थान मांडून आहे. दिवसभर लपून बसून रात्रीच्यावेळी ही श्वापदे पिकांवर ताव मारतात यात ते खाते कमी व नासाडी जास्त करतात. काही दिवसांपूर्वी बिबट्याने गाईवर हल्ला करून गार्इंना जखमी केल्याची घटना घडल्यापासून शेतकरी रात्री पिकांची रखवाली करण्यास जाण्यासाठी घाबरतात. सध्या कापूस, तूर, चणा व गहू ही पीके शेतात असून श्वापदे दररोज पिकांची नासाडी करीत आहे. या शिवारात फेरफटका मारला असता प्रत्येक शेतात पिकांचे नुकसान आढळते. या गावात ठाकरे कुटूंबियांची संख्या अधिक असून श्रीधर ठाकरे, गजानन ठाकरे, रमेश ठाकरे, सुरेश ठाकरे, भाष्कर ठाकरे, गणेश ठाकरे, रामरावजी महात्मे या शेतकºयांनी पिकांच्या नुकसाबद्दल व्यथा मांडून दररोज वनविभागाकडे किती प्रस्ताव सादर करावे. शेतीची कामे करावी की प्रस्तावासाठी कागदपत्रे गोळा करण्यात वेळ खर्ची घालावा असा प्रश्न उपस्थित केला. समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढल्याशिवाय शेतकºयांच्या व्यथा थांबणार नाहीत हे मात्र वास्तव आहे.कन्नमवारग्राम येथे पिकांची नासाडीकन्नमवारग्राम- येथील वृत्तपत्र विक्रेता श्रीकांत देविदास धुर्वे यांच्या मालकीचे शेत हेटी शिवारात आहे. हा भाग जंगलव्याप्त असल्यामुळे बारमाही या भागात वन्यप्राण्याच्या हैदोस आहे. शेतकºयांनी ज्वारी, कपाशी, तूर, सोयाबीन पेरले पण अचानकपणे दसºया पासून या परिसरात सर्वत्र वाघाचे दर्शन गावकºयांना होवू लागले. तर कुणाची गाय कुणाची म्हैस मारल्याचे दिसू लागले. त्यामुळे या गावातील व परिसरातील शेतकºयांनी जागली जाणे बंद केले. त्यामुळे डुकरे, रोही, हरण यांनी शेतकºयांची पºहाटी व तूर राजरोसपणे फस्त करणे सुरू केले. त्याच प्रमाणे याही शेतकºयाच्या जवळपास ५-६ एकर शेतातील तूर व कापूस पिकाचे नुकसान केले. त्यामुळे परिपक्व पिकाचे नुकसान जवळपास शेतकºयाचे ६०-७० हजार रूपयेच झाले आहे. वनविभागाला शेतकºयाने माहिती, कागदपत्रानिशी दिली आहे. तरी शेतकºयांनी वनविभागाने चौकशी करून योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. वन्यजीवाच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरी