शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

विकासकामांनी शेतकऱ्यांची वाढविली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:19 PM

जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.

ठळक मुद्देकालव्याच्या खोदकामाने वाहतुकीस अडथळा : वाहनचालकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शासनाकडून केल्या जात असलेल्या विकासकामांमुळे सुविधेऐवजी गैरसोयच अधिक होत असल्याचे चित्र चिकणी परिसरात दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: महामार्ग जलयुक्त शिवार अंतर्गत निम्न वर्धा प्रकल्प यशोदा नदी खोरे पुनर्जीवनअंतर्गत नदी, नाले, खोलीकरण, रूंदीकरण, सरळीकरण आदी विकासकामे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचे वास्तव आहे.विकास कामांमुळे डेरेदार वृक्ष धाराशाही पडलेत. तसेच जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.अधिकाऱ्यांनी कामामध्ये अनियमितता दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खोदकामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. चिकणी, पढेगाव, वर्धा हा १६ कि.मी. अंतराचा डांबरी रस्ता असून या रस्त्यावर तीन ठिकाणी कालव्याच्या कामाकरिता खोदकाम करण्यात आले. भोयर यांच्या शेताजवळच्या वळणावर व रमेश नेहारे यांच्या शेताजवळ कालव्याच्या पाटसऱ्या टाकण्यात आल्यात. तिन्ही ठिकाणी डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण गरजेचे होते. परंतु, ठिकाणी माती टाकून बुजविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे वर्दळ असते. एसटी बससह स्कूलबस, दुचाकी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. खोदकामामुळे पडलेल्या खड्ड्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकरी तथा वाहनचालक करीत आहेत.कामांचा दर्जाही सुमारचिकणी जामणी, पढेगावसह अन्य भागात विकासकामे सुरू आहेत; मात्र कामांचा दर्जा सुमार असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. विकासकामे करताना निदान काही दिवस तग धरतील, अशी करावी, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.