शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले अन् आता बाजारात दर वाढले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:05 IST

सोयाबीनला यंदा पहिल्यांदा उच्चांकी दर : फायदा व्यापाऱ्यांचाच, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी) : भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे.

हमीभावापेक्षा कमी असला तरी सोयाबीनला वर्षभरातील उच्चांकी ४ हजार ७०० रुपये क्विंटल दर सध्या बाजार समित्यांमध्ये मिळत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांजवळ सोयाबीन शिल्लक नाही. त्यामुळे दरवाढीचा लाभशेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन सप्टेंबर अखेरपासून सुरू होणार आहे. यंदा ५ हजार ३२८ रुपये हमीभावाचा फायदा शासन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना होणार आहे. सध्याची दरवाढ त्याचा परिणाम असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. गतवर्षी दरवाढीच्या प्रतीक्षेत काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. परंतु दरवाढीची शक्यता नसल्याने पेरणीच्या तोंडावर मिळेल त्या भावात सोयाबीन विकले. त्यामुळे उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. त्यामुळे यंदा सोयाबीन पेरणी क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला, नफा घटलाबियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, मजुरी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत दरवर्षीच उत्पन्नात कमी व भावदेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ताळेबंद बिघडला असल्याचे दिसून येते.

वर्षभर सोयाबीनमध्ये मंदीगतवर्षी सोयाबीनला ३ हजार ५००, तर वर्षभर चार हजार रुपयांचे आत भाव मिळाला. नाफेडची खरेदी उशिरा सुरू झाली व यामध्ये अटी-शर्तीचा भरणा होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन खासगी बाजारात विकले.

यंदाच्या हंगामात सोयाबीनचा पेरा किती?तालुका     क्षेत्र (हे.आर)आर्वी          १४,५७१आष्टी          ८,१९९कारंजा       ११,६५५वर्धा           १९,६८०सेलू           १८,२८९देवळी        १७,३५०हिंगणघाट   १६,८५०समुद्रपूर     २३,५१६

सोयाबीनचे बाजारभाव (रुपये प्रतिक्विंटल)६ ऑगस्ट - ४२५० ते ४५५९७ ऑगस्ट - ४३५० ते ४७००८ ऑगस्ट - ४४५० ते ४७२५९ ऑगस्ट - ४४५० ते ४७५५११ ऑगस्ट - ४४५० ते ४७४७५०

४३६ रूपयांची दरामध्ये झालीय वाढगतवर्षी केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये व यंदा ४३६ रुपयांची वाढ करण्यात येऊन ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. शासन खरेदीत शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

अडते काय म्हणतात...सोयाबीनची आवक कमी आहे. त्यातच देशांतर्गत डीओसी दरवाढ झाली, हमीभाव देखील वाढले, प्लॉटद्वारे अखेरची खरेदी सुरू आहे व तेलाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे सोयाबीनची दरवाढ झाली. विरेंद्र भुसारी, अडते, बाजार समिती, वर्धा.

"मागच्या वर्षी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ होता. नाफेडच्या अनेक जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात ३ हजार २०० ते ३ हजार ६०० रुपयात सोयाबीन विकले. बरेच महिने सोयाबीनचे भाव ३ हजार ६००ते ३ हजार ८०० रुपयांपर्यंत होते. आता कोणत्याच शेतकऱ्याजवळ सोयाबीन शिल्लक नाही. या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. हे दरवर्षीचेच असल्याने शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची गरज आहे."- प्रवीण भोयर, शेतकरी, चिकणी. 

टॅग्स :SoybeanसोयाबीनFarmerशेतकरीwardha-acवर्धा