शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

शेतकऱ्यांना मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:03 IST

अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही,....

ठळक मुद्देविरोधी पक्ष नेत्यांचे वेधले लक्ष : राजू तिमांडे यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही, अशी तक्रार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली. नागपूर येथे मुंडे यांची भेट घेवून त्यांनी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था विषद केली.माजी आमदार राजू तिमांडे म्हणाले की ५ जुलैपासुन सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभी पीके करपल्या गेली आहे. शेतकऱ्यांना तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर, सेलू तालुक्यात पावसाने सलग २५ तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीमुळे नांद धरणाचे ६ दरवाजे, वडगाव धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग झाल्याने नदी व नाल्याकाठच्या शेतजमिनीतील उभी पीके ४८ तासाच्यावर पाण्यात होती. त्यामुळे शेतजमिनीतील उभी पीके खरवडून गेली.काही गावामध्ये पाणी घुसल्यामुळे घरे पडलेत.एकुण ४५७७.२ हेक्टरचे ३३ टक्याच्या आत तर ५७६५.२२ हेक्टरचे ३३ टक्याच्या वर नुकसान झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील १६८ गावांना पुराचा फटका बसला असून घरांची पडझड झाली आहे. आणि पुरामध्ये जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडलेली आहे. तरी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती लक्षात घेता सरकार कडून सर्वे करुन आर्थिक मदत देण्यात येईल, अशी अपेक्षा होती. वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाला याबाबतचा अहवाल पाठविला. परंतु, १० दिवसाचा कालावधी लोटूनही याबाबत शासनाने आर्थिक मदत जाहीर केली नाही. याकडे तिमांडे यांनी ना. धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले.विधान परिषदेत मुद्दा मांडणारअनेक शेतकऱ्यांना बोंडअळीचे पैसे मिळाले नाही. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत हिंगणघाट मतदार संघात झालेल्या नुकसानी बाबत आपण विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधणार आहोत, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राजू तिमांडे यांना सांगितले.

टॅग्स :Raju Timandeराजू तिमांडेDhananjay Mundeधनंजय मुंडे