शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विरोधी सरकारी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 21, 2016 02:04 IST

शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही,

जानराव नागमोते : किसान सभेचा कारंजा (घा.) तालुका शेतकरी मेळावा
कारंजा (घा.) : शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही, शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते, किटनाशके, शेतमजुराची मजुरी, जीवन जगण्याचा खर्च वाढला. यामुळे शेतीचा लागत खर्च वाढला. निघालेला शेतमाल विकून गुंतविलेली रक्कम वसूल होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून आत्महत्येकडे वळला. शेतकरी आत्महत्यांना केंद्र-राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच कारणीभूत आहे, असे मत किसान सभेचे जिल्हा सचिव जाणराव नागमोते यांनी व्यक्त केले.
किसान सभेद्वारे तालुका शेतकरी मेळावा गुरूदेव मठ सभागृहात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे परसराम जसुतकर, प्रतिष्ठित नागरीक नाना जाधव उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, माकपाचे महेश दुबे, बांधकाम कामगार संघटनेचे गजू ढोरे, जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना स्वामीनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दरवर्षी हमीभाव आणि त्यात हमीभावाच्या ५० टक्के नफा जोडून सर्व प्रकारचे शेतमालाचे हमीभाव केंद्र सरकारने जाहीर करावे. त्यात दरवर्षी वाढत्या महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करावी. जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था शासनाने करावी. त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही, असे मत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, महेश दुबे, अनिल चव्हाण आदींनी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संजय देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता दामोधर कौरती, महादेव देशमुख, माधवराव मडावी, अशोक पुरी, धर्माजी अंबुडारे, गुरूदत्त बारंगे, सुभाष बागडे, छत्रपाल चोपडे, रमेश उईके, जगदीश बैस, मालती चाफले, सुनीता नायर, शेख मोईउद्दीन, दिलीप शेंडे आदींनी सहकार्य केले. मेळाव्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)