शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शेतमालाचे भावही दरवर्षी वाढले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी यांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने लोकमतने सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी आढावा घेतला. यावेळी अनेकांनी आपली स्पष्ट मते सांगत सरकारी धोरण बदलविण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीत लोकमतने घेतला प्रश्नांचा आढावा

शेतकरी, व्यापाऱ्यांशी साधला संवादविजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी यांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने लोकमतने सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी आढावा घेतला. यावेळी अनेकांनी आपली स्पष्ट मते सांगत सरकारी धोरण बदलविण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात बोलताना नागापूर (करंजी भोगे) येथील प्रभुलाल गुप्ता म्हणाले की, कापसाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन व महागाईनुसार वेतन वाढतात. त्याच धर्तीवर शासनाने शेतमालाचे भाव ठरविणे आवश्यक आहे. भाव वाढतील म्हणून कापूस आजपर्यंत ठेवला. भाव वाढलाही पण, कापसाचे वजन घटले. शासनाने शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर केल्या; पण या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी असलेल्या जाचक अटी त्रासदायक ठरत आहे. नगदी चुकरा आता नोटबंदीमुळे चेकने झाल्याने चुकारा मिळण्यास विलंब होतो. सेलू बाजारपेठेत लिलाव पद्धत चांगली असल्याने या बाजार पेठेत माल विक्रीस आणत असतो, असेही ते म्हणाले. तर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी राम नारायण पाठक म्हणाले की, बाजार समित्या सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा, कर्मचाºयांचे वेतनही शासनाने करावे, व्यापाºयांना परवाना हा डीडीआरकडून द्यावा. दरवर्षी परवाना नूतनीकरणासाठी व्यापाºयांना येणारा खर्च पाहता ही मुदत पाच वर्ष करावी, सेस हा १,०५ पैसे शेकडा व्यापाºयांकडून घेतला जातो. त्यापैकी शासनाला फक्त पाच पैसेच मिळतात. हा संपूर्ण सेस शासनाने जमा करावा. यात शेतकºयांच्यस चुकाºयाची हमी शासन घेईल व ऐपत नसलेल्यांना मतासाठी परवाना देण्याची पद्धत बंद होईल. शासनाच्या ताबा जर बाजार समितीवर राहिला तर ते व्यापारी, कर्मचारी व शेतकरी हिताचे ठरेल.सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकरी हितासाठी आहे. पण, शासनाने बाजार समित्यांना पूर्ण स्वायत्तता द्यावी तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल साठवून ठेवण्यासाठी शेतात गोदाम बांधण्याकरिता अनुदान देण्याची गरज आहे. यामुळे जेव्हा भाव वाढतील तेव्हा शेतमाल विकता येईल. धनादेशाने मिळणारा चुकारा हा विलंबाने मिळतो. बाजार समितीत शेतकऱ्यांना आपला शेतमाल ठेवता यावा, यासाठी सुसज्ज गोदामांची निर्मिती, हमीभाव मिळावा म्हणून नाफेडची प्रत्येक बाजार समितीत खरेदी केंद्र सुरु करावे. त्यामुळे शेतकºयाला चांगला भाव मिळू शकतो. शासनाने शेतकºयांचे हित जोपासण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र ही काळाची गरज आहे.- संदीप वाणी, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे).केळी परवडत नसल्याने काही प्रमाणात केळीची लागवड करतो. इतर पिकांच्या माध्यमातून उत्पन्न काढत असलो तरी कापूस, सोयाबीन व चणा या पिकाला शासनाने जाहीर केलेला भाव मिळत नाही. बाजार समितीत शेतमाल विक्रीस नेला असता दरवाज्यावर बाजार समितीकडून फॉर्म भरून घेतला जातो. त्यात मिळालेला भाव मान्य आहे, अशा मजकुरावर सही घेतली जाते. त्यामुळे हमीभावानुसार दर मिळणे कठीण आहे. हमीभावानुसार शेतमालाची खरेदीकरणे बंधनकारक असावे, त्यात ग्रेड नसावी.- मंगेश राऊत, शेतकरी, घोराड.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड