शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

शेत, धुऱ्यावरील आगीने वृक्षांना धोका

By admin | Updated: April 18, 2017 01:20 IST

खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता.

खत करण्याकडे कानाडोळा : शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल गरजेचावर्धा : खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता. यासाठी प्रसंगी मजूर लावून शेतातील काडीकचरा गोळा केला जात होता. त्याचे ढिग लावून ते एकाच वेळी बैलबंडीतून घरी नेले जात होते वा शेतातील गोठ्यांत ठेवले जात होते; पण हल्ली हा काडीकचरा शेतातच जाळण्याचे फॅड आले आहे. शिवाय धुरेही पेटविले जात आहेत. परिणामी, पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या वृक्षांची मोठी हानी होत आहे. याकडे लक्ष देत गुन्हे दाखल करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे. शनिवारी व रविवारी शेतकऱ्यांनी धुरे पेटविल्याने शेतातील गोठ्यांची राखरांगोळी झाली. यात अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीसाहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने पूढील हंगामासाठी नव्याने साहित्याची जुळवाजुळव करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे प्रकार नित्याचे झाल्याने अनेक ठिकाणी गोठ्यांना आग लागले, झाडे जळण्याच्या घटना घडत आहेत. शेजारचे शेतकरी असे प्रकार घडल्यास तक्रारी करीत असून मग, दोषी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे रविवारच्या प्रकरणावरून दिसून येते. यामुळे आपसातील वाद वाढीस लागत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. शेतातून निघणाऱ्या काडीकचऱ्यापासून खत निर्मिती करणे, त्याचा सरपण म्हणून वापर करणे, कोळसा निर्माण करणे आदी प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)गॅस सिलिंडरमुळे इंधन म्हणून वापरही कमीसेवाग्राम : इंधन म्हणून पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या आणि तुरीच्या खुुंटल्यांचा उपयोग केला जात होता; पण नव्या व्यवस्था व सुविधांमुळे ते शेतातच जाळण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर आला आहे. याचा परिणाम लगतच्या झाडांवर होऊ लागला असून लाखमोलाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत.भारतात कृषी व्यवस्था प्रमुख साधन व माध्यम झाले. काळाच्या ओघात परिवर्तन व कृषी संशोधन होऊन क्रांती घडू लागली. याचा परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शेतातील साधन साहित्य जीवनाचा आधार आणि दैनिक गरजा भागविणारा होता. यात इंधन एक साधन होते. शेतातील बाभूळ पऱ्हाट्या, तुराट्या व तुराट्यांचे खुंटले याचा सरपण म्हणून सर्वाधिक उपयोग केला जात होता. घरी, गावात शेतात ठेवण्यासाठी जागा होत्या. उलंगवाडी होताच इंधनाची व्यवस्था शेतकरी व शेतमजूर लावत होते. याच इंधनावर घरातील पाणी गरम करणे ते स्वयंपाक होत होते. आता गॅस सिलिंडरने इंधनाची जागा घेतली आहे. यामुळे तुराट्या, पऱ्हाट्यांच्या मागणीत घट झाली आहे. उपडायला व न्यायला कुणीच तयार होत नसल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने ढिगारे करून ते शेतातच पेटवित आहे. यातून साधन साहित्याचे नुकसान होत आहे. शेतकरी शेतमजुरांचा सिलिंडरमुळे खर्च मात्र वाढला.(वार्ताहर)खरडे व प्लायवूड निर्मितीसाठी उपयोग मध्यंतरी शेतातील तुराट्या, पऱ्हाट्या व तुरीच्या खुंटल्यांचा वापर खरडे व प्लायवूड निर्मितीकरिता करण्याचा प्रयत्न झाला. यात ऊसाच्या पाल्याचाही समावेश होता. या प्रयोगाचे नेमके काय झाले, हे पूढे आले नाही. हा प्रयोग यशस्वी ठरून शेतकऱ्यांपयृंत पोहोचला असता तर तुराट्या, पऱ्हाट्यांची किंमतही वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता यावर कुठलेही संशोधन होत नसल्याने हा काडीकचरा जाळला जात आहे. शिवाय यातून होणारे प्रदूषण टाळता आले असते. सध्या पऱ्हाट्या, तुराट्या व खुंटल्यांचा उपयोगच होत नसल्याने नाईलाजास्तव ते पेटवावे लागते आहे. परिणामी, दररोजच शेतात, धुऱ्यांवर काडीकचरा पेटविला जात असल्याने परिसर धगधगताना दिसतो.