शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेत, धुऱ्यावरील आगीने वृक्षांना धोका

By admin | Updated: April 18, 2017 01:20 IST

खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता.

खत करण्याकडे कानाडोळा : शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल गरजेचावर्धा : खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता. यासाठी प्रसंगी मजूर लावून शेतातील काडीकचरा गोळा केला जात होता. त्याचे ढिग लावून ते एकाच वेळी बैलबंडीतून घरी नेले जात होते वा शेतातील गोठ्यांत ठेवले जात होते; पण हल्ली हा काडीकचरा शेतातच जाळण्याचे फॅड आले आहे. शिवाय धुरेही पेटविले जात आहेत. परिणामी, पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या वृक्षांची मोठी हानी होत आहे. याकडे लक्ष देत गुन्हे दाखल करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे. शनिवारी व रविवारी शेतकऱ्यांनी धुरे पेटविल्याने शेतातील गोठ्यांची राखरांगोळी झाली. यात अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीसाहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने पूढील हंगामासाठी नव्याने साहित्याची जुळवाजुळव करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे प्रकार नित्याचे झाल्याने अनेक ठिकाणी गोठ्यांना आग लागले, झाडे जळण्याच्या घटना घडत आहेत. शेजारचे शेतकरी असे प्रकार घडल्यास तक्रारी करीत असून मग, दोषी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे रविवारच्या प्रकरणावरून दिसून येते. यामुळे आपसातील वाद वाढीस लागत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. शेतातून निघणाऱ्या काडीकचऱ्यापासून खत निर्मिती करणे, त्याचा सरपण म्हणून वापर करणे, कोळसा निर्माण करणे आदी प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)गॅस सिलिंडरमुळे इंधन म्हणून वापरही कमीसेवाग्राम : इंधन म्हणून पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या आणि तुरीच्या खुुंटल्यांचा उपयोग केला जात होता; पण नव्या व्यवस्था व सुविधांमुळे ते शेतातच जाळण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर आला आहे. याचा परिणाम लगतच्या झाडांवर होऊ लागला असून लाखमोलाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत.भारतात कृषी व्यवस्था प्रमुख साधन व माध्यम झाले. काळाच्या ओघात परिवर्तन व कृषी संशोधन होऊन क्रांती घडू लागली. याचा परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शेतातील साधन साहित्य जीवनाचा आधार आणि दैनिक गरजा भागविणारा होता. यात इंधन एक साधन होते. शेतातील बाभूळ पऱ्हाट्या, तुराट्या व तुराट्यांचे खुंटले याचा सरपण म्हणून सर्वाधिक उपयोग केला जात होता. घरी, गावात शेतात ठेवण्यासाठी जागा होत्या. उलंगवाडी होताच इंधनाची व्यवस्था शेतकरी व शेतमजूर लावत होते. याच इंधनावर घरातील पाणी गरम करणे ते स्वयंपाक होत होते. आता गॅस सिलिंडरने इंधनाची जागा घेतली आहे. यामुळे तुराट्या, पऱ्हाट्यांच्या मागणीत घट झाली आहे. उपडायला व न्यायला कुणीच तयार होत नसल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने ढिगारे करून ते शेतातच पेटवित आहे. यातून साधन साहित्याचे नुकसान होत आहे. शेतकरी शेतमजुरांचा सिलिंडरमुळे खर्च मात्र वाढला.(वार्ताहर)खरडे व प्लायवूड निर्मितीसाठी उपयोग मध्यंतरी शेतातील तुराट्या, पऱ्हाट्या व तुरीच्या खुंटल्यांचा वापर खरडे व प्लायवूड निर्मितीकरिता करण्याचा प्रयत्न झाला. यात ऊसाच्या पाल्याचाही समावेश होता. या प्रयोगाचे नेमके काय झाले, हे पूढे आले नाही. हा प्रयोग यशस्वी ठरून शेतकऱ्यांपयृंत पोहोचला असता तर तुराट्या, पऱ्हाट्यांची किंमतही वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता यावर कुठलेही संशोधन होत नसल्याने हा काडीकचरा जाळला जात आहे. शिवाय यातून होणारे प्रदूषण टाळता आले असते. सध्या पऱ्हाट्या, तुराट्या व खुंटल्यांचा उपयोगच होत नसल्याने नाईलाजास्तव ते पेटवावे लागते आहे. परिणामी, दररोजच शेतात, धुऱ्यांवर काडीकचरा पेटविला जात असल्याने परिसर धगधगताना दिसतो.