शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

तान्हा पोळ्याला कर्मचारी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 9:40 PM

विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरण येथील प्रकार : खुर्च्या, टेबलांना मिळाली पंख्यांची हवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले. इतर कार्यालयात कर्मचारी कामात असताना या कार्यालयात कर्मचाºयांच्या टेबल खुर्च्यांना पंखे हवा आणि दिवे प्रकाश देत होते. यामुळे येणारा व्यक्ती कर्मचारी तान्हा पोळ्यात गेले, असे बोलून परत जात असल्याचे चित्र दिसून आले.शासकीय कर्मचाºयांना सुट्ट्यांची कमतरता नाही. शनिवार, रविवारसह प्रत्येक लहान-मोठ्या सणाची सुटी असते. शासकीय सुट्टी नसली तर काही सुट्या ‘कलेक्टर डिक्लीयर’ असतात. यंदा आॅगस्ट महिन्यात बरेच सण आहेत. गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिन या सुट्ट्या एकत्र आल्या तर पोळ्यासाठी यंदा जिल्हाधिकाºयांनीही पोळ्याची सुट्टी जाहीर केली नाही. असे असले तरी मंगळवारी शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. तीन ते चार कर्मचारी आपापली कामे करीत असल्याचे बघावयास मिळाले; पण उर्वरित सर्व खोल्या निर्मनुष्य होत्या. या कार्यालयातील शिपायाने पंखे आणि लाईट मात्र सर्वच खोल्यांतील सुरू करून ठेवल्याचे पाहावयास मिळाले. जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ हे न्यायालयीन कामानिमित्त नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली. बहुदा यामुळेच कर्मचाºयांनीही कार्यालयाला बुट्टीच मारल्याचे दिसून आले.उर्वरित कामाच्या दिवसांतही या कार्यालयामध्ये असाच प्रकार पाहावयास मिळतो. जीवन प्राधिकरणमध्ये कार्यरत बहुतांश कर्मचारी ये-जा करतात. यामुळे हे कार्यालय दुपारी ४ वाजताच्या नंतर रितेच दिसून येते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांना त्यांची कामे कोणत्या वेळेत करून घ्यावीत, असा प्रश्न पडतो. मंगळवारी काही नागरिक जीवन प्राधिकरणमध्ये सदोष मिटरबाबत तक्रारी करण्यासाठी तथा ते बदलून घेण्याकरिता आले होते; पण जबाबदार अधिकारी नसल्याने तथा कर्मचारीही नसल्याने त्यांना बराच वेळ ताटकळावे लागले.शासकीय कार्यालयात विजेचा अपव्ययमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये सुमारे ५० ते ६० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाºयांसाठी पंखे, लाईटची पुरेशी व्यवस्था आहे; पण दप्तर दिरंगाईमुळे येथेच सर्वाधिक विजेचा अपव्यय होत असल्याचे पाहावयास मिळाले. मंगळवारी कार्यालयात केवळ एकाच खोलीमध्ये तीन ते चार कर्मचारी असताना उर्वरित तीन ते चार खोल्यांमधील पंखे व लाईट सुरू होते. वीज ग्राहकांना विजेची बचत करण्याचा सल्ला दिला जातो; पण शासकीय कार्यालयातील विजेचा अपव्यय कोण रोखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मी सध्या न्यायालयीन कामानिमित्त नागपूर येथील न्यायालयात आहे. आज सुटी नाही. कर्मचारी कार्यालयात राहायला हवेत. आमच्याकडे एक विभाग व दोन उपविभाग आहे. याबाबत माहिती घेतो.- डी.एस. वाघ, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, वर्धा.