शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सहा कोटींचा अपहार... चौघांना अटक, मात्र वर्षभरापासून तपास ठप्प

By चैतन्य जोशी | Updated: January 10, 2023 14:46 IST

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : सरकारी बांधकाम कामगार कार्यालयातील प्रकरण

वर्धा : वर्ध्यातील सरकारी बांधकाम कामगार कार्यालयात तब्बल सहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आले होते. पोलिसांनी तत्कालीन सरकारी कामगार अधिकाऱ्यांसह तिघांना अटक केली खरी; पण मागील वर्षभरापासून तपासाला ‘स्टॉप’ करण्यात आल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस अधीक्षकांनी स्वत: लक्ष देऊन चौकशी करण्याची गरज आहे.

तत्कालीन कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण यांच्या कार्यकाळात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामार्फत १८ हजार २१८ बांधकाम कामगारांना २३ कोटी ५ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरीत केले होते. या अनुदान वाटपात तब्बल ६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाणसह कामगार कार्यालयातील कर्मचारी जगदीश कडू, तसेच राणी दुर्गावती कामगार मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना बेड्याही ठोकल्या. पण, त्यानंतर आज जवळपास वर्ष उलटले तरी या प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तपासात का दिरंगाई केली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी तत्काळ दखल घेत चौकशी करण्याची गरज आहे.

६ हजार १८६ अर्ज अभिलेखावरून झाले होते गहाळ

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामार्फत १८ हजारांवर कामगारांना २३ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले होते. मात्र, या अनुदान वाटपात केवळ १० हजार ३१८ अर्ज अभिलेखावर दिसून आले, तर तब्बल ६ कोटी रुपयांच्या लाभाचे ६ हजार १८६ अर्ज अभिलेखावरून गहाळ झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. मात्र, यानंतर पुढे कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

एकाच संघटनेच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई, उर्वरित संघटनांचे काय?

बोगस कामगार दाखवून सहा कोटी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात जिल्ह्यातील २६ बांधकाम कामगार संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. पोलिसांनी राणी दुर्गावती कामगार संघटनेच्या कार्यालयात छापा टाकून बनावट शिक्के आणि काही बनावट कागदपत्र जप्त केली होती. अध्यक्षांसह एका सदस्याला अटकही केली होती. मात्र, त्यानंतर पाणी नेमके कुठे मुरले, उर्वरित संघटनांकडे पोलिसांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे उर्वरित संघटनांचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

कुणाच्या ‘प्रेशर’खाली तपास थांबवला?

तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या कार्यकाळात बोगस कामगार दाखवून करोडो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत होती. मात्र, वर्ष उलटले तरी हा तपास पुढे गेलेला नाही. त्यामुळे कुणाच्या ‘प्रेशर’खाली तर तपास थांबविला नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धाPoliceपोलिसfraudधोकेबाजीLabourकामगार