शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

सहा कोटींचा अपहार... चौघांना अटक, मात्र वर्षभरापासून तपास ठप्प

By चैतन्य जोशी | Updated: January 10, 2023 14:46 IST

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : सरकारी बांधकाम कामगार कार्यालयातील प्रकरण

वर्धा : वर्ध्यातील सरकारी बांधकाम कामगार कार्यालयात तब्बल सहा कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आले होते. पोलिसांनी तत्कालीन सरकारी कामगार अधिकाऱ्यांसह तिघांना अटक केली खरी; पण मागील वर्षभरापासून तपासाला ‘स्टॉप’ करण्यात आल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस अधीक्षकांनी स्वत: लक्ष देऊन चौकशी करण्याची गरज आहे.

तत्कालीन कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण यांच्या कार्यकाळात इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामार्फत १८ हजार २१८ बांधकाम कामगारांना २३ कोटी ५ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरीत केले होते. या अनुदान वाटपात तब्बल ६ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाणसह कामगार कार्यालयातील कर्मचारी जगदीश कडू, तसेच राणी दुर्गावती कामगार मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना बेड्याही ठोकल्या. पण, त्यानंतर आज जवळपास वर्ष उलटले तरी या प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तपासात का दिरंगाई केली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी तत्काळ दखल घेत चौकशी करण्याची गरज आहे.

६ हजार १८६ अर्ज अभिलेखावरून झाले होते गहाळ

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयामार्फत १८ हजारांवर कामगारांना २३ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले होते. मात्र, या अनुदान वाटपात केवळ १० हजार ३१८ अर्ज अभिलेखावर दिसून आले, तर तब्बल ६ कोटी रुपयांच्या लाभाचे ६ हजार १८६ अर्ज अभिलेखावरून गहाळ झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. मात्र, यानंतर पुढे कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.

एकाच संघटनेच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई, उर्वरित संघटनांचे काय?

बोगस कामगार दाखवून सहा कोटी रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात जिल्ह्यातील २६ बांधकाम कामगार संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. पोलिसांनी राणी दुर्गावती कामगार संघटनेच्या कार्यालयात छापा टाकून बनावट शिक्के आणि काही बनावट कागदपत्र जप्त केली होती. अध्यक्षांसह एका सदस्याला अटकही केली होती. मात्र, त्यानंतर पाणी नेमके कुठे मुरले, उर्वरित संघटनांकडे पोलिसांनी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे उर्वरित संघटनांचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

कुणाच्या ‘प्रेशर’खाली तपास थांबवला?

तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या कार्यकाळात बोगस कामगार दाखवून करोडो रुपयांचा अपहार केल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत होती. मात्र, वर्ष उलटले तरी हा तपास पुढे गेलेला नाही. त्यामुळे कुणाच्या ‘प्रेशर’खाली तर तपास थांबविला नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धाPoliceपोलिसfraudधोकेबाजीLabourकामगार