शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:06 IST

तळेगाव-आर्वी राष्ट्रीय महामार्गातील वास्तव

अमोल सोटे

आष्टी (शहीद) : तळेगाव (श्याम पंत) ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला गेल्या चार वर्षांपासून साडेसाती लागली आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून तिसऱ्याची नियुक्ती करण्यात आली; पण अद्यापही कामाचा थांगपत्ता नाही. आतापर्यंत झालेल्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी करून काम न करताही तब्बल १८ कोटींचे देयक अदा करून शासनाला चुना लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तळेगाव ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये आतापर्यंत ७० कोटींचा निधी खर्च करण्यात आला असून यात निम्मेही काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असून या विभागातील सर्वच अधिकारी कंत्राटदार एजन्सीच्या मर्जीत वावरत असल्याने चार वर्षांनंतरही काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, हा महामार्ग अनेकांकरिता काळ ठरला असून अपघातातही वाढ झाली आहे. कामाचे वारंवार सुधारित दराने अंदाजपत्रक तयार करणे, जवळच्या एजन्सीला त्यानुसार कामे देणे, नंतर त्याच एजन्सीकडून काम परवडत नसल्याची बोंबाबोंब करणे. त्यातूनच खोटे व बनावट देयक काढणे, असा सावळागोंधळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी चालविला.

काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीकरिता लोकप्रतिनिधींनी निवेदने, धरणे-आंदोलने केली. विविध कार्यालयांवर मोर्चाही काढला; पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यात बनावट देयकाच्या आधारे १८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती खुद्द महामार्गाच्या एका अधिकाऱ्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. यासंदर्भात पुराव्यानिशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी गोपनीय चौकशीही करण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमध्येच आपसी वाद-विवाद असून हे सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून यात अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.

महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्याचे हात वर

सुरुवातीला या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर्धा यांच्याकडे होते. या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमीच खाली राहत असून दौऱ्याचेच कारण दिले जातात. त्यानंतर हे काम नागपूर महामार्ग कार्यालयाकडे हस्तांतरित करून तेथून कारभार चालविण्यात आला. आता पुन्हा दुसऱ्या विभागाला जबाबदारी देऊन काम करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. यासाठी नागपूर येथील एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली. त्या एजन्सीचे नावसुद्धा आम्हाला माहीत नाही. आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. असे बोलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्याने आपली भूमिका झटकली. आता या राष्ट्रीय महामार्गाचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांकडून तक्रारीला केराची टोपली

या महामार्गाचे सुरुवातीला खोदकाम करून ठेवले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सिमेंटीकरणापर्यंतचे देयक देऊन मोकळे झाले. चार वर्षांचा कार्यकाळ होऊनही काम पूर्ण झाले नसल्याने या कामातील १८ कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी तळेगाव, आष्टी, वर्धमनेरी, आर्वी येथील नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली; पण या भ्रष्टाचारात लुप्त असलेल्या अधिकाऱ्यांनी तक्रारींना केराची टोपलीच दाखविली.

माहिती अधिकारालाही दाखविल्या वाकुल्या

या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणकडे असल्याने अनेकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील अधिकाऱ्यांनी माहितीच उपलब्ध करून न देता एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम केले. नागपूरचे उपविभागीय अभियंता टाके यांच्याकडे या महामार्गाची जबाबदारी असल्याने त्यांना या महामार्गाच्या खर्चाची माहिती मागितली असता आता हा महामार्ग आमच्याकडून दुसऱ्या विभागाकडे गेला. त्या विभागाचे अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधा, असे सांगितले. जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

तळेगाव - आर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून शेकडो अपघात झाले तरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. वारंवार निविदा प्रक्रिया आणि भ्रष्टाचार करणे एवढाच उद्योग सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

- रूपेश बोबडे, शिवसेना तालुकाप्रमुख, आष्टी (शहीद).

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार