शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१२ किमीच्या महामार्गात अठरा कोटींचे घबाड, काम न करताच देयक काढून शासनाला लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:06 IST

तळेगाव-आर्वी राष्ट्रीय महामार्गातील वास्तव

अमोल सोटे

आष्टी (शहीद) : तळेगाव (श्याम पंत) ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला गेल्या चार वर्षांपासून साडेसाती लागली आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून तिसऱ्याची नियुक्ती करण्यात आली; पण अद्यापही कामाचा थांगपत्ता नाही. आतापर्यंत झालेल्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी करून काम न करताही तब्बल १८ कोटींचे देयक अदा करून शासनाला चुना लावल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तळेगाव ते आर्वी या बारा किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गामध्ये आतापर्यंत ७० कोटींचा निधी खर्च करण्यात आला असून यात निम्मेही काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असून या विभागातील सर्वच अधिकारी कंत्राटदार एजन्सीच्या मर्जीत वावरत असल्याने चार वर्षांनंतरही काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, हा महामार्ग अनेकांकरिता काळ ठरला असून अपघातातही वाढ झाली आहे. कामाचे वारंवार सुधारित दराने अंदाजपत्रक तयार करणे, जवळच्या एजन्सीला त्यानुसार कामे देणे, नंतर त्याच एजन्सीकडून काम परवडत नसल्याची बोंबाबोंब करणे. त्यातूनच खोटे व बनावट देयक काढणे, असा सावळागोंधळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी चालविला.

काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीकरिता लोकप्रतिनिधींनी निवेदने, धरणे-आंदोलने केली. विविध कार्यालयांवर मोर्चाही काढला; पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे या महामार्गाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यात बनावट देयकाच्या आधारे १८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती खुद्द महामार्गाच्या एका अधिकाऱ्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. यासंदर्भात पुराव्यानिशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी गोपनीय चौकशीही करण्यात आली आहे. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमध्येच आपसी वाद-विवाद असून हे सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आला असून यात अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.

महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्याचे हात वर

सुरुवातीला या महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वर्धा यांच्याकडे होते. या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या नेहमीच खाली राहत असून दौऱ्याचेच कारण दिले जातात. त्यानंतर हे काम नागपूर महामार्ग कार्यालयाकडे हस्तांतरित करून तेथून कारभार चालविण्यात आला. आता पुन्हा दुसऱ्या विभागाला जबाबदारी देऊन काम करणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. यासाठी नागपूर येथील एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली. त्या एजन्सीचे नावसुद्धा आम्हाला माहीत नाही. आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. असे बोलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंत्याने आपली भूमिका झटकली. आता या राष्ट्रीय महामार्गाचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अधिकाऱ्यांकडून तक्रारीला केराची टोपली

या महामार्गाचे सुरुवातीला खोदकाम करून ठेवले आणि अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सिमेंटीकरणापर्यंतचे देयक देऊन मोकळे झाले. चार वर्षांचा कार्यकाळ होऊनही काम पूर्ण झाले नसल्याने या कामातील १८ कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी तळेगाव, आष्टी, वर्धमनेरी, आर्वी येथील नागरिकांनी वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली; पण या भ्रष्टाचारात लुप्त असलेल्या अधिकाऱ्यांनी तक्रारींना केराची टोपलीच दाखविली.

माहिती अधिकारालाही दाखविल्या वाकुल्या

या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणकडे असल्याने अनेकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील अधिकाऱ्यांनी माहितीच उपलब्ध करून न देता एकमेकांकडे बोट दाखविण्याचेच काम केले. नागपूरचे उपविभागीय अभियंता टाके यांच्याकडे या महामार्गाची जबाबदारी असल्याने त्यांना या महामार्गाच्या खर्चाची माहिती मागितली असता आता हा महामार्ग आमच्याकडून दुसऱ्या विभागाकडे गेला. त्या विभागाचे अधिकारी जगताप यांच्याशी संपर्क साधा, असे सांगितले. जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

तळेगाव - आर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून शेकडो अपघात झाले तरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. वारंवार निविदा प्रक्रिया आणि भ्रष्टाचार करणे एवढाच उद्योग सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

- रूपेश बोबडे, शिवसेना तालुकाप्रमुख, आष्टी (शहीद).

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार