शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पावसाअभावी ४.१५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 00:27 IST

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पीक अडचणीत : बळीराजावर अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे. येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास पाण्याअभावी जिल्ह्यातील सुमारे ४.१५ लाख हेक्टर कोरडवाहू क्षेत्रावरील पीक करपण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ३ हेक्टरवर धान, ६६३ हेक्टरवर ज्वारी, ६२ हेक्टरवर मका, ६२ हजार ८८२.५ हेक्टरवर, मुग २८२ हेक्टरवर, उडीद २५१ हेक्टरवर, भुईमुंग ४५७ हेक्टरवर, सोयाबीन १ लाख १५ हजार ६७९ हेक्टरवर तर २ लाख १९ हजार ५ हेक्टर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण सुमारे ५ लाख ५६ हजार हेक्टरपैकी केवळ १ लाख ४१ हजार हेक्टरवरच ओलिताची सोय आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ज्या शेतकºयांकडे ओलिताची सोय आहे ते शेतकरी योग्य निगा घेतल्याने बºया पैकी वाढ झालेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोयच नाही त्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील तूर, कपाशी, सोयाबीन पीक करपण्यास सुरूवात होईल, असे सांगितले जात असून यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.कपाशी व तूर पीक दमधरूनजिल्ह्यात ओलिताच्या शेतजमिनीच्या तूलनेत कोरडवाहू शेतजमिनीचे क्षेत्र जास्त आहे. गत काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्यास्थितीत कपाशी व तूर पीक दमधरूनच आहे. येत्या चार-पाच दिवसात पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील हे उभे पीक करपण्यास सुरूवात होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.सोयाबीन पीक हातचे जाण्याची भीतीयंदा १ लाख १५ हजार ६६९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्यास्थितीत हे पीक फुलावर असून येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस होत या पिकाला पुरेसे पाणी न मिळाल्यास फुलगळतीला सुरूवात होईल. शिवाय पावसाचा खंड त्यापेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील सोयाबीन पीक बळीराजाच्या हातचे जाईल, असे बोलले जात आहे.काळीची शेत जमीन असलेल्या शेतात सध्या ओलावा कायम आहे. परंतु, मुरमाड शेतजमिनीत ओलावा पाहिले तसा नसल्याचे दिसून येते. येत्या दोन दिवसात पाऊस न आल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची फुलगळती सुरू होत हे पीक करपण्यास सुरूवात होईल, अशी स्थिती आहे. पावसाचा खंड काही दिवस कायम राहत कडक ऊन तापल्यास तूर, कपाशी, सोयाबीन आदी पीक करपण्यास सुरूवात होईल. येत्या काही दिवसात जोरदार पाऊसाची आशा असून तसा हवामान खात्याचा अंदाज आहे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी