शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धाच्या जलसाठ्यात झपाट्याने होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:53 IST

अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकेवळ ९६.६४ दलघमी पाणीसाठा : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्धा नदीपात्रात आठ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्यातील सर्वात मोठे असे वर्धा अप्पर धरण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणातून आर्वी, अमरावती, मोर्शी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी तर त्याच परिसरातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केल्या जातो; पण मागील दोन वर्षांतील अत्यल्प पर्जन्यमान यामुळे धरणही पाहिजे तसे भरले नाही. तर सध्या या धरणात ९६.६४ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.यंदा या धरणाने सर्वाधिक तळ गाठला आहे. तर परिसरातील अनेक विहिरींनी व बोअरवेल सध्या कोरड्या झाल्याने नागरिकांना भीषण जलसंकटालाच सामोरे जावे लागत आहे. येत्या काही दिवसात या धरणातील पाणी पातळीत मोठी घट होत नागरिकांना जलसमस्येला तोंड द्यावे लागेल असे सांगण्यात येते. आर्वी शहरापेक्षा परिसरातील गावांमध्ये सध्या नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.असे असले तरी लोकप्रतिनिधी केवळ शांत बसून असल्याचे दिसते. जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.गाळमुक्त धरण केल्यास वाढेल पाणी साठवण क्षमताशासनाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नालाखोली करणाची कामे हाती घेण्यात येतात. शिवाय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक धरणांमधून गाळ काठून त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ केली जाते. असाच काहीसा प्रयोग अप्पर वर्धा धरणासंबंधी करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढे आले पाहिजे. ही काळाजी गरज असल्याचे सुजान नागरिक सांगतात. अप्पर वर्धा धरण गाळमुक्त झाल्यास त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. शिवाय त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना होईल.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई