शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अप्पर वर्धाच्या जलसाठ्यात झपाट्याने होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:53 IST

अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देकेवळ ९६.६४ दलघमी पाणीसाठा : उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे

पुरूषोत्तम नागपुरे।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अप्पर वर्धा धरणातील पाणी पातळीत सध्या झपाट्याने घट होत आहे. अपर वर्धा धरणाच्या जलाशयावर आर्वी, अमरावती व मोर्शीसह अन्य गाव करांची तहान भागविली जाते. पण सध्या या जलाशयात उपयुक्त जलसाठा केवळ ९६.०५ इतका असल्याने येत्या काही दिवसात नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्धा नदीपात्रात आठ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्यातील सर्वात मोठे असे वर्धा अप्पर धरण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणातून आर्वी, अमरावती, मोर्शी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी तर त्याच परिसरातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केल्या जातो; पण मागील दोन वर्षांतील अत्यल्प पर्जन्यमान यामुळे धरणही पाहिजे तसे भरले नाही. तर सध्या या धरणात ९६.६४ दलघमी उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.यंदा या धरणाने सर्वाधिक तळ गाठला आहे. तर परिसरातील अनेक विहिरींनी व बोअरवेल सध्या कोरड्या झाल्याने नागरिकांना भीषण जलसंकटालाच सामोरे जावे लागत आहे. येत्या काही दिवसात या धरणातील पाणी पातळीत मोठी घट होत नागरिकांना जलसमस्येला तोंड द्यावे लागेल असे सांगण्यात येते. आर्वी शहरापेक्षा परिसरातील गावांमध्ये सध्या नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.असे असले तरी लोकप्रतिनिधी केवळ शांत बसून असल्याचे दिसते. जलसंकटावर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.गाळमुक्त धरण केल्यास वाढेल पाणी साठवण क्षमताशासनाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नालाखोली करणाची कामे हाती घेण्यात येतात. शिवाय गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक धरणांमधून गाळ काठून त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ केली जाते. असाच काहीसा प्रयोग अप्पर वर्धा धरणासंबंधी करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढे आले पाहिजे. ही काळाजी गरज असल्याचे सुजान नागरिक सांगतात. अप्पर वर्धा धरण गाळमुक्त झाल्यास त्याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. शिवाय त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना होईल.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई