शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पाऊस नसतानाही शेतकऱ्यांकडून धूळपेरणीची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:42 PM

जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतातील सिंचनाचे स्रोत उचक्या देत आहेत. तरीही निसर्गाच्या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणीची तयारी करीत कपाशी बियाणे डोबणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा कायमच : निसर्गाच्या आशेवर शेतकऱ्यांचा शेतीत जुगार

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : जून महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शेतातील सिंचनाचे स्रोत उचक्या देत आहेत. तरीही निसर्गाच्या आशेवर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणीची तयारी करीत कपाशी बियाणे डोबणे सुरू केले आहे.मागील वर्षी ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी मे महिन्यातच कपाशीचे बियाणे डोबले होते. यंदा तप्त ऊन, आटलेल्या विहिरी पाहून शेतकºयांनी धाडस केले नाही. मात्र, काही शेतकऱ्यांनी भरउन्हात व पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना धूळपेरणीचे धाडस करून शेतीत चक्क जुगार खेळणे सुरू केल्याची स्थिती आहे.ज्या शेतकºयांच्या शेतातील विहिरीत पुरेसे पाणी आहे, ते ठिंबक, स्प्रिंकलरचा वापर करून पाणी देईल. मात्र, तप्त ऊन कोवळ्या रोपट्यांची वाट लावण्याची जास्त शक्यता आहे. आज-उद्या पाऊस येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, पाऊस कधी येईल याचा नेम नाही. शेतकऱ्यांनी बियाणे जमिनीत टाकताना अतिरिक्त धाडस करणे धोक्याचेही ठरू शकते, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. कृषी तज्ज्ञाचा सल्ला शेतकºयांना फायद्याचा ठरणारा आहे.पावसाची प्रतीक्षा कायमचजोरदार पाऊस होईल, अशी सर्वांना आशा असली तरी तो प्रत्यक्ष केव्हा बरसेल, याची प्रतीक्षा कायम आहे. महागडे बियाणे भरउन्हात जमिनीत टाकणे सुरू आहे. कृषितज्ज्ञ व शेतकऱ्यांच्या मते आता लावलेली कपाशी व पावसाने जमीन चिंब झालेली असताना लावलेली कपाशी यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा व सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरीशेतीत हा जुगार खेळतात. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी धूळपेरणीचे धाडस केल्यास आर्थिक फटका सोसावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती