शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

मद्यप्राशन करून वाहन चालविताय? सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:31 IST

वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास तीन महिन्यांकरिता परवाना निलंबनासोबतच पोलीस कारवाईअंती थेट तुरुंगात जावे लागणार आहे.

ठळक मुद्देपरवाना निलंबनासह खावी लागेल तुरुंगाची हवा

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास तीन महिन्यांकरिता परवाना निलंबनासोबतच पोलीस कारवाईअंती थेट तुरुंगात जावे लागणार आहे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सध्या वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जात आहे.शहरात मागील काही वर्षांपासून नवशिक्या वाहनचालकांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. वेगाने वाहन पिटाळणे, रस्त्यावर स्टंटबाजी करणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, विना परवाना, विना हेल्मेट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे चालकांच्या आदी बेशिस्त कृतींमुळे वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत असून यात निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकवार कारवाईचा बडगा उगारून देखील या प्रकारांना आळा बसलेला नाही. शहरातील बॅचलर रोड, प्रमुख मार्ग, नागपूर मार्ग व अन्य वर्दळीच्या मार्गांवर नवशिके आणि तरुणाई वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसते. ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने आता कंबर कसली आहे.आता विहित मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडून जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या बेशिस्त कृती वाहनचालकांना भोवणार आहेत. असे आढळून आल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार वाहनचालकांचा परवाना किमान तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या कारवाईला प्रारंभ झालेला आहे.मद्य प्राशन करून, अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास परवाना निलंबनाच्या कारवाईव्यतिरिक्त खटला दाखल करण्यात येणार असून मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १८५ नुसार पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केल्यास वाहनधारकाला तुरूंगातही जावे लागणार आहे.परवाने निलंबनाकरिता २५० प्रस्तावअतिवेगाने, शिवाय वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे व अन्य प्रकारे कारवाईच्या अनुषंगाने परवाने निलंबनाचे २५० प्रस्ताव पोलिस विभागाकडे आले असून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने लवकरच निलंबित करण्यात येणार आहेत.आता महामार्गांवर हेल्मेटसक्तीअपघातांचे प्रमाण टाळण्याकरिता गतवर्षी शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. याला विविध स्तरातून विरोध झाला, तरीदेखील कारवाई सुरूच होती. यामुळे अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. मध्यंतरीच्या काळात वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षकांचे सावंगी ठाण्यात स्थानांतरण झाल्यानंतर ही कारवाई गुंडाळली गेल्याने हेल्मेटचा विषय मागे पडता होता. हेल्मेटसक्तीत आता वाहतूक पोलिसांनी शिथिलता आणली असून आता लवकरच महामार्गांवर हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे.रस्ते अपघातात पाच वर्षांत ९८८ जणांचा मृत्यू२०१३ मध्ये अपघाताच्या ६८८ घटना घडल्यात. यात १५८ जणांचा मृत्यू झाला. १६२ जणांना गंभीर, तर तर ३१८ जणांना किरकोळ दुखापत झाली. २०१४ मध्ये ५६३ अपघात झालेत. यात १६६ जणांना जीव गमवावा लागला. ११३ जणांना गंभीर तर २३२ जणांना किरकोळ इजा झाली. २०१५ मध्ये ५४५ अपघात १७२ जणांचा मृत्यू, १०२ जणांना गंभीर तर २२५ जणांना किरकोळ इजा झाली. २०१६, १७९ जणांचा मृत्यू, १२० जणांना गंभीर तर २४६ जणांना किरकोळ दुखापत, २०१७ मध्ये १६७ जणांचा मृत्यू, १०४ जणांना गंभीर तर १९६ जणांना किरकोळ, २०१८ या वर्षात १४६ जणांना जीव गमवावा लागला. ८९ जणांना गंभीर तर १३० जणांना किरकोळ दुखापत झाली.

टॅग्स :liquor banदारूबंदीAccidentअपघात