शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 28, 2015 00:24 IST

मागील ३० वर्षांपासून डोंगरगाव (सायंकार) येथील नागरिकांनी पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात प्रकल्पाला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येते.

हिंगणघाट : मागील ३० वर्षांपासून डोंगरगाव (सायंकार) येथील नागरिकांनी पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात प्रकल्पाला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येते. मात्र शासनाकडून प्रस्तावित जागेवर पुनर्वसन केले जात नाही. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाने भेट घेऊन येथील प्रमुख समस्यांवर चर्चा करून १८ नागरी सुविधा प्रदान करण्याची मागणी केली.डोंगरगाव हे पोथरा नदीच्या तीरावर असून या नदीवर वरच्या बाजूला पोथरा धरण, लालनाला प्रकल्प व लभानसराड धरण बनविण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या गावाला पाण्याचा वेढा पडून बेटाचे स्वरूप निर्माण होते. अनेकदा येथे पूर परिस्थितीमुळे डोंगरगावच्या लोकांचे काही दिवसांसाठी पावसाळ्यात स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे १९९८ मध्ये विशेष बाब म्हणून या गावाचे पूनवर्सन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्वसन स्थळावर नियमानुसार १८ नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, आवश्यक असते. मागील ३० वर्र्षांपासून तेथे नागरी सुविधा उपलब्ध झाल्या नाही. रस्ते व नाल्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. ग्रामपंचायत भवन बांधले नाही. आरोग्य केंद्र नाही, वीज वितरणचे काम पूर्णत्वास गेले नाही. स्मशानभूमीत शेडचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पुनर्वसित गावात २८४ भूखंड पडले असताना व २२० भुखंडाचे वाटप झाले. असूनही अद्याप अपूर्ण नागरी सुविधांमुळे कुणीही येथे वास्तव्य करीत नाही. डोंगरगावची लोकसंख्या १ हजार ७२५ असून यापैकी ६० टक्के नागरिक शेतकरी आहे. ९० टक्के शेती धरणांतर्गत बुडीत क्षेत्रात गेली असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत नाही. हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या ग्रामस्थांकडे पुनर्वसित जागेत घर बांधकामकरिता पुरेसे पैसे नाहीत. पुनर्वसित जागेत घरे बांधून द्यावी अन्यथा घर बांधण्याइतपत अनुदान द्यावे, या मागण्या होत्या. आ. समीर कुणावार, किशोर दिघे, पं.स.सदस्य वामन चंदनखेडे, नामदेव बरडे, विठ्ठल मंगाम, संतोष सुपारे आदींचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)पुनर्वसन करताना नागरिकांना प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा प्रदान करण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र येथील पुनर्वसनात नागरिकांना प्रमुख १८ सुविधा प्रदान केलेल्या नाही. यामुळे येथे वास्तव्य करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात प्रकल्पातील पाण्यामुळे गावाला पुराचा वेढा पडतो. यामुळे नागरिकांना वित्तहानी सोसावी लागते. अशा स्थितीत येथील नागरिकांना आवस्यक सुविधा प्रदान करून आर्थिक स्थैर्य प्रदान करण्याची मागणी होत आहे. याकरिता आंदोलन करूनही कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याने ग्रामस्थांत असंतोष आहे.