शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

डोंगरगाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 28, 2015 00:24 IST

मागील ३० वर्षांपासून डोंगरगाव (सायंकार) येथील नागरिकांनी पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात प्रकल्पाला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येते.

हिंगणघाट : मागील ३० वर्षांपासून डोंगरगाव (सायंकार) येथील नागरिकांनी पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. पावसाळ्यात प्रकल्पाला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येते. मात्र शासनाकडून प्रस्तावित जागेवर पुनर्वसन केले जात नाही. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाने भेट घेऊन येथील प्रमुख समस्यांवर चर्चा करून १८ नागरी सुविधा प्रदान करण्याची मागणी केली.डोंगरगाव हे पोथरा नदीच्या तीरावर असून या नदीवर वरच्या बाजूला पोथरा धरण, लालनाला प्रकल्प व लभानसराड धरण बनविण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या गावाला पाण्याचा वेढा पडून बेटाचे स्वरूप निर्माण होते. अनेकदा येथे पूर परिस्थितीमुळे डोंगरगावच्या लोकांचे काही दिवसांसाठी पावसाळ्यात स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे १९९८ मध्ये विशेष बाब म्हणून या गावाचे पूनवर्सन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्वसन स्थळावर नियमानुसार १८ नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, आवश्यक असते. मागील ३० वर्र्षांपासून तेथे नागरी सुविधा उपलब्ध झाल्या नाही. रस्ते व नाल्यांचे काम अद्यापही अपूर्ण आहे. ग्रामपंचायत भवन बांधले नाही. आरोग्य केंद्र नाही, वीज वितरणचे काम पूर्णत्वास गेले नाही. स्मशानभूमीत शेडचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पुनर्वसित गावात २८४ भूखंड पडले असताना व २२० भुखंडाचे वाटप झाले. असूनही अद्याप अपूर्ण नागरी सुविधांमुळे कुणीही येथे वास्तव्य करीत नाही. डोंगरगावची लोकसंख्या १ हजार ७२५ असून यापैकी ६० टक्के नागरिक शेतकरी आहे. ९० टक्के शेती धरणांतर्गत बुडीत क्षेत्रात गेली असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत नाही. हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या ग्रामस्थांकडे पुनर्वसित जागेत घर बांधकामकरिता पुरेसे पैसे नाहीत. पुनर्वसित जागेत घरे बांधून द्यावी अन्यथा घर बांधण्याइतपत अनुदान द्यावे, या मागण्या होत्या. आ. समीर कुणावार, किशोर दिघे, पं.स.सदस्य वामन चंदनखेडे, नामदेव बरडे, विठ्ठल मंगाम, संतोष सुपारे आदींचा समावेश होता.(तालुका प्रतिनिधी)पुनर्वसन करताना नागरिकांना प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा प्रदान करण्याची जबाबदारी शासनाची असते. मात्र येथील पुनर्वसनात नागरिकांना प्रमुख १८ सुविधा प्रदान केलेल्या नाही. यामुळे येथे वास्तव्य करणे शक्य होत नाही. पावसाळ्यात प्रकल्पातील पाण्यामुळे गावाला पुराचा वेढा पडतो. यामुळे नागरिकांना वित्तहानी सोसावी लागते. अशा स्थितीत येथील नागरिकांना आवस्यक सुविधा प्रदान करून आर्थिक स्थैर्य प्रदान करण्याची मागणी होत आहे. याकरिता आंदोलन करूनही कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याने ग्रामस्थांत असंतोष आहे.