शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने पोळतोय जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील विद्युत निर्मिती केंद्र कोळसा नसल्याने बंद झाल्याचे कारण देत राज्यभर भारनियमनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र चढाओढच लावली आहे. जो अभियंता सर्वाधिक वीज वाचवेल, त्याला पुरस्कार, या धर्तीवरच भारनियमन लादले गेले आहे. परिणामी, नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. महावितरणने अभियंत्यांत लावलेली ...

ठळक मुद्देशेतकरी, नागरिकांत असंतोष : उकाडा व गर्मीने सारेच बेजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील विद्युत निर्मिती केंद्र कोळसा नसल्याने बंद झाल्याचे कारण देत राज्यभर भारनियमनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र चढाओढच लावली आहे. जो अभियंता सर्वाधिक वीज वाचवेल, त्याला पुरस्कार, या धर्तीवरच भारनियमन लादले गेले आहे. परिणामी, नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. महावितरणने अभियंत्यांत लावलेली ही स्पर्धा बंद करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत वीज चोरी व वीज गळती अधिक असलेल्या शहर, ग्रामीण भागात भारनियमन लादले जात होते. यानंतर सिंगल फेज वीज पुरवठा पद्धत सुरू करून भारनियमन बंद करण्यात आले. आता दोन्ही पद्धती सुरू असताना अवाजवी भारनियमनाचा बडगा उगारला जात असल्याचेच पाहावयास मिळत आहे. शहरी भागात दोन ते सहा तास तर ग्रामीण भागात नऊ ते बारा तास भारनियमन केले जात आहे. परिणामी, उकाडा व गर्मीने संपूर्ण जिल्हाच पोळला जात आहे. यातही महावितरणच्या उपविभागांमध्ये स्पर्धा रंगली आहे. कोणता अभियंता अधिक वीज वाचवितो यावर शाबासकी देण्याची पद्धत रूढ केली जात आहे. यामुळे जनतेला मात्र चटके सोसावे लागताहेत. अवाढव्य बिले आकारून जनतेची लूट तर महावितरण करीत आहेच, आता भारनियमनाद्वारे नागरिकांना त्रस्त करीत आहे. या प्रकारामुळे नागरिकांतील असंतोष वाढत आहे.जिल्ह्यातील भारनियमन त्वरित बंद करा; भीम टायगर सेनेची मागणीजिल्हा महावितरण कंपनीद्वारे ग्रामीण भागात ८ ते ९ तास भारनियमन केले जात आहे. यात शेतकºयांना थ्री-फेज लाईन केवळ ५ ते ६ तास मिळत आहे. ही वेळ रात्री १२ ते ७ पर्यंत ठेवली आहे. शेतकरी रात्रीला कोणत्या पद्धतीने पिकांचे सिंचन करणार, हा प्रश्नच आहे. रात्री ओलित करताना शेतकºयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळेच शेतकी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. भारनियमनामुळे पाणी पुरवठाही प्रभावित होत आहे. सिंगल फेज वीज पुरवठाही उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. यामुळे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी भीम टायगर सेनेने केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून विशाल रामटेके, नितीन कुंभारे, अतुल दिवे आदींनी दिला आहे.सहा तासाच्या भारनियमनाने शेतकरी, नागरिक व रुग्ण त्रस्तरोहणा - कोळशाच्या कमतरतेने ऊर्जा उत्पादनात घट व ऊर्जेच्या मागणीत वाढीचे कारण पूढे करून शासनने दररोज नियमित भारनियमनाच्या व्यतिरिक्त सहा तास अतिरिक्त भारनियमन सुरू करण्यात आले आहे. परिणामी, परिसरातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व रुग्ण त्रस्त झाले आहे. हे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.अत्यल्प पावसामुळे खरीपातील कपाशी, रबीतील पिके पेरण्यासाठी जमीन तयार करताना ओलिताची गरज आहे. वातावरणातील उकाड्यामुळे घरी राहणाºया महिला, वृद्ध नागरिक व रुग्णांना पंख्याची गरज पडते. व्हायरल फीव्हरमुळे प्रत्येक घरी रुग्ण आढळतात. घरातील उकाड्यामुळे या घटकांना अस्वस्थ होत आहे. अशावेळी घराघरात विजेची गरज असताना महावितरण नियमित भारनियमनाशिवाय सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत तर गुरूवार, रविवार दुपारी साडेतीन ते रात्री साडेनऊपर्यंत सतत सहा तास अतिरिक्त भारनियमन करीत आहे. या भारनियमनामुळे समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. परिणामी, गावोगावी ‘हेच काय मोदींचे अच्छे दिन’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारनियमनाने शेतातील पिकांना ओलित कसे करावे, रुग्णांवर औषधोपचार कसे करावेत, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारनियमन त्वरित रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.