शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
3
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
4
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
5
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
6
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
7
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
8
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
9
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
10
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
11
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
12
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
13
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
14
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
15
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
16
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
18
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
19
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
20
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय

भारनियमनाने पोळतोय जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील विद्युत निर्मिती केंद्र कोळसा नसल्याने बंद झाल्याचे कारण देत राज्यभर भारनियमनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र चढाओढच लावली आहे. जो अभियंता सर्वाधिक वीज वाचवेल, त्याला पुरस्कार, या धर्तीवरच भारनियमन लादले गेले आहे. परिणामी, नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. महावितरणने अभियंत्यांत लावलेली ...

ठळक मुद्देशेतकरी, नागरिकांत असंतोष : उकाडा व गर्मीने सारेच बेजार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यातील विद्युत निर्मिती केंद्र कोळसा नसल्याने बंद झाल्याचे कारण देत राज्यभर भारनियमनाचा बडगा उगारण्यात आला आहे. यात महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी मात्र चढाओढच लावली आहे. जो अभियंता सर्वाधिक वीज वाचवेल, त्याला पुरस्कार, या धर्तीवरच भारनियमन लादले गेले आहे. परिणामी, नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. महावितरणने अभियंत्यांत लावलेली ही स्पर्धा बंद करून भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत वीज चोरी व वीज गळती अधिक असलेल्या शहर, ग्रामीण भागात भारनियमन लादले जात होते. यानंतर सिंगल फेज वीज पुरवठा पद्धत सुरू करून भारनियमन बंद करण्यात आले. आता दोन्ही पद्धती सुरू असताना अवाजवी भारनियमनाचा बडगा उगारला जात असल्याचेच पाहावयास मिळत आहे. शहरी भागात दोन ते सहा तास तर ग्रामीण भागात नऊ ते बारा तास भारनियमन केले जात आहे. परिणामी, उकाडा व गर्मीने संपूर्ण जिल्हाच पोळला जात आहे. यातही महावितरणच्या उपविभागांमध्ये स्पर्धा रंगली आहे. कोणता अभियंता अधिक वीज वाचवितो यावर शाबासकी देण्याची पद्धत रूढ केली जात आहे. यामुळे जनतेला मात्र चटके सोसावे लागताहेत. अवाढव्य बिले आकारून जनतेची लूट तर महावितरण करीत आहेच, आता भारनियमनाद्वारे नागरिकांना त्रस्त करीत आहे. या प्रकारामुळे नागरिकांतील असंतोष वाढत आहे.जिल्ह्यातील भारनियमन त्वरित बंद करा; भीम टायगर सेनेची मागणीजिल्हा महावितरण कंपनीद्वारे ग्रामीण भागात ८ ते ९ तास भारनियमन केले जात आहे. यात शेतकºयांना थ्री-फेज लाईन केवळ ५ ते ६ तास मिळत आहे. ही वेळ रात्री १२ ते ७ पर्यंत ठेवली आहे. शेतकरी रात्रीला कोणत्या पद्धतीने पिकांचे सिंचन करणार, हा प्रश्नच आहे. रात्री ओलित करताना शेतकºयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळेच शेतकी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. भारनियमनामुळे पाणी पुरवठाही प्रभावित होत आहे. सिंगल फेज वीज पुरवठाही उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी ग्रामस्थ त्रस्त आहेत. यामुळे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी भीम टायगर सेनेने केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून विशाल रामटेके, नितीन कुंभारे, अतुल दिवे आदींनी दिला आहे.सहा तासाच्या भारनियमनाने शेतकरी, नागरिक व रुग्ण त्रस्तरोहणा - कोळशाच्या कमतरतेने ऊर्जा उत्पादनात घट व ऊर्जेच्या मागणीत वाढीचे कारण पूढे करून शासनने दररोज नियमित भारनियमनाच्या व्यतिरिक्त सहा तास अतिरिक्त भारनियमन सुरू करण्यात आले आहे. परिणामी, परिसरातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व रुग्ण त्रस्त झाले आहे. हे भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.अत्यल्प पावसामुळे खरीपातील कपाशी, रबीतील पिके पेरण्यासाठी जमीन तयार करताना ओलिताची गरज आहे. वातावरणातील उकाड्यामुळे घरी राहणाºया महिला, वृद्ध नागरिक व रुग्णांना पंख्याची गरज पडते. व्हायरल फीव्हरमुळे प्रत्येक घरी रुग्ण आढळतात. घरातील उकाड्यामुळे या घटकांना अस्वस्थ होत आहे. अशावेळी घराघरात विजेची गरज असताना महावितरण नियमित भारनियमनाशिवाय सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत तर गुरूवार, रविवार दुपारी साडेतीन ते रात्री साडेनऊपर्यंत सतत सहा तास अतिरिक्त भारनियमन करीत आहे. या भारनियमनामुळे समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. परिणामी, गावोगावी ‘हेच काय मोदींचे अच्छे दिन’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारनियमनाने शेतातील पिकांना ओलित कसे करावे, रुग्णांवर औषधोपचार कसे करावेत, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारनियमन त्वरित रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.