शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा ‘कायापालट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:00 AM

शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाऱ्यांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्यावर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.

ठळक मुद्देविविध विभागांचा बदलला चेहरा । लाखो रुग्णांना मिळतोय दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा सध्या चेहरा बदलल्याचे बघावयास मिळत आहे. तेथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून ‘स्वच्छ रुग्णालय... उत्तम रुग्णालय’ हे ब्रिद वाक्य प्रत्यक्ष कृतीत उतरवून बापूंना आदरांजली अर्पण केली जात आहे.शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाºयांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्यावर रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. प्रत्येक गरजूंसह रुग्णाला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासह त्यांचे विश्वास संपादीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न असल्याने रुग्णांनाही दिलासा मिळत आहे.पाच वर्षांत १,०५५ गंभीर शस्त्रक्रियाजिल्हा सामान्य रुग्णालयात मागील पाच वर्षांत अनेक किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्या असून याच कालावधीत तब्बल १ हजार ५५ गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रीया करण्यात तेथील वैद्यकीय अधिकाºयांना यश आले आहे.६,०५८ गर्भवती महिलांना दिला उपचारकुपोषणमुक्त वर्धा जिल्हा या दृष्टीने आरोग्य विभाग विशेष प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसुती विभागाकडून १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत तब्बल ६ हजार ५७ गर्भवती महिलांना चांगली आरोग्य सेवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कौशल्य पणाला लावून एका गर्भवती महिलेची प्रसुती केली. त्या महिलेने तिळ्यांना जन्म दिलातीनवेळा पटकाविला तृतीय पुरस्कारशासनाच्या महत्त्वाकांशी उपक्रम असलेल्या ‘कायकल्प’ स्पर्धेत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने यापूर्वी तीन वेळा तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. शिवाय पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम रुग्णालय प्रशासनाने रुग्णसेवेसाठी खर्च केल्याचे सांगण्यात आले.प्रथम पुरस्कारासाठी धडपडकायाकल्प या स्पर्धेत मागील तीन वर्ष सतत तृतीय पुरस्कार पटकाविणाºया जिल्हा सामान्य रुग्णालयाने यंदा प्रथम पुरस्कार खेचूनच आणू अशी तयारी केली आहे. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ५० लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाल्यास पुरस्काराच्या रक्कमेतून आणखी चांगली आरोग्य सेवा देण्याचा मानस तेथील अधिकाºयांचा असल्याचे सांगण्यात येते.शुक्रवारी येणार अधिकाऱ्यांची चमूकायाकल्प या उपक्रमाच्या स्पर्धेत उडी घेतलेल्या वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवांची पाहणी करण्यासाठी शुक्रवार ७ फेब्रुवारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू येत आहे. या चमूतील अधिकारी काही रुग्णांशीही संवाद साधणार असून त्यानंतर ते आपला अभिप्राय वरिष्ठांना सादर करणार आहेत.वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने यापूर्वी तीन वेळा कायाकल्पचा तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. स्वच्छ रुग्णालय आणि चांगली आरोग्य सेवा देत प्रत्यक्ष कृतीतून आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य