शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.

ठळक मुद्देध्वनी, वायूप्रदूषण घटले : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रस्तेही घेताहेत मोकळा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर आहे. तर नोंदणीकृत वाहनांची संख्या ३ लाख ८ हजार ९६० आहे. याशिवाय सार्वजनिक वाहनांची संख्या वेगळी आहे.मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.तो आता थांबला आहे. त्यामुळे शुद्ध हवेत काही काळ वावरता येणार आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे.वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वाहनांमुळे होणारे किरकोळ अपघात आणि वादावादीही बंद झाल्याचे चित्र सध्या शहरातच नाही जिल्ह्याभरात पहावयास मिळत आहे.दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाखांवरजिल्ह्यात ३ लाख ८ हजार ९६० नोंदणीकृत सर्व प्रकारची वाहने आहेत. यात मोटर, कार व इतर चारचाकी वाहने २० हजार ८२०, दुचाकींची संख्या २ लाख ५५ हजार १७७ इतकी आहे. ही सर्व वाहने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागीच थांबली असल्याने ध्वनी आणि वायूप्रदूषणात बंदच्या काळापासून घट झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात किमान चार दुचाकी वाहने आहेत. गुढीपाडवा आणि सणोत्सवात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि नोंदणी होते. यावेळी गुढीपाडवा सणावरही कोरोनाचे सावट होते. परिणामी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली नाही. संचारबंदीमुळे मागील ११ दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. यामुळे प्रदूषणात साहजिकच घट झाली आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब म्हणावी.-विजय तिराणकरसहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpollutionप्रदूषण