शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.

ठळक मुद्देध्वनी, वायूप्रदूषण घटले : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रस्तेही घेताहेत मोकळा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर आहे. तर नोंदणीकृत वाहनांची संख्या ३ लाख ८ हजार ९६० आहे. याशिवाय सार्वजनिक वाहनांची संख्या वेगळी आहे.मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.तो आता थांबला आहे. त्यामुळे शुद्ध हवेत काही काळ वावरता येणार आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे.वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वाहनांमुळे होणारे किरकोळ अपघात आणि वादावादीही बंद झाल्याचे चित्र सध्या शहरातच नाही जिल्ह्याभरात पहावयास मिळत आहे.दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाखांवरजिल्ह्यात ३ लाख ८ हजार ९६० नोंदणीकृत सर्व प्रकारची वाहने आहेत. यात मोटर, कार व इतर चारचाकी वाहने २० हजार ८२०, दुचाकींची संख्या २ लाख ५५ हजार १७७ इतकी आहे. ही सर्व वाहने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागीच थांबली असल्याने ध्वनी आणि वायूप्रदूषणात बंदच्या काळापासून घट झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात किमान चार दुचाकी वाहने आहेत. गुढीपाडवा आणि सणोत्सवात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि नोंदणी होते. यावेळी गुढीपाडवा सणावरही कोरोनाचे सावट होते. परिणामी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली नाही. संचारबंदीमुळे मागील ११ दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. यामुळे प्रदूषणात साहजिकच घट झाली आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब म्हणावी.-विजय तिराणकरसहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpollutionप्रदूषण