शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

विकासाच्या नावावर विनाशाला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:18 PM

अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.

ठळक मुद्देमाला माथुर : जाजू महाविद्यालयात तपोधन श्रीकृष्णदास जाजू जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाने जो विकास साधला आह, हा काही चमत्कार नाही. त्यासाठी अनेक महापुरूषांचे तप खर्ची लागले आहे. परंतु सध्या विकासाच्या नावावर विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक असल्याने यात बदल घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण ही युवापिढी या देशाचे भवितव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी माला माथुर यांनी केले.शिक्षा मंडळद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, पिपरी (मेघे) येथे तपोधन श्रीकृष्णदास जाजू यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पुरूषोत्तम कालभूत होते. डॉ.उल्हाज जाजू, उपप्राचार्य प्रा.सुरेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते. माला माथुर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा. या स्पर्धात्मक युगात दुसऱ्याशी स्पर्धा करून वाईट विचारांचा मनात शिरकाव करण्यापेक्षा स्वत:शीच स्पर्धा करा. कालच्यापेक्षा आजचा दिवस कसा चांगला जाईल, याचा प्रयत्न करा. समर्पित भावनेने आपले जीवन व्यथित करा, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तपोधन श्रीकृष्णदास जाजू हे माझे आजोबा होते. यावेळी डॉ.उल्हास जाजू यांनीसुद्धा मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पुरूषोत्तम कालभूत यांनी तपोधन जाजू यांच्या कार्याचा वसा घेण्याचे आवाहन केले. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ यानुसार आपले कार्य असले पाहिजे. महात्मा गांधी आणि तपोधन जाजू यांचे कार्य असे होते. महात्मांच्या विचारावरच ते चालले, कारण त्यांचे विचार मार्गदर्शक आहेत. याच विचारांच्या बळामुळे आपण यशस्वी होऊ शकतो, असेही डॉ.कालभूत म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. मिलिंद माने यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन प्रा. सलीम शेख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Socialसामाजिक