राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सवलत

By Admin | Updated: July 17, 2014 00:17 IST2014-07-17T00:17:47+5:302014-07-17T00:17:47+5:30

खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खरीप, ज्वारी, सोयाबिन, तूर व कपाशी पिकांकरिता सर्व तालुका, खरीप भुईमुंग पिकांकरिता आर्वी, आष्टी व कारंजा ही

Discounts to farmers under National Agriculture Crop Insurance Scheme | राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सवलत

राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सवलत

वर्धा : खरीप हंगामामध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खरीप, ज्वारी, सोयाबिन, तूर व कपाशी पिकांकरिता सर्व तालुका, खरीप भुईमुंग पिकांकरिता आर्वी, आष्टी व कारंजा ही तीन तालुका भुईमूग, मुंग, उडीद व तीळ पीक आर्वी तालुक्यातील व ऊस पुर्व हंगामी व ऊस खोडवा पिकांकरिता आर्वी, वर्धा, सेलू, देवळी व ऊस करिता आवी, वर्धा, सेलू व समुद्रपूर या चार तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे.
पीक विमा योजनेसाठी वर्धा जिल्ह्याच्या विमा हप्ता दरात अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५० टक्के सर्व पिके व कापूस पिकांसाठी अल्प, अत्यल्प शेतकरी ७५ टक्के व इतर शेतकरी यांना ५० टक्के विशेष सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अधिसुचित तालुका अधिसुचित पीक व अधिसुचित मंडळे याची यादी संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात या योजनेत सहभागी होण्याची अंतीम तारीख पेरणीपासून एक महिना किंवा ३१ जुलै २०१४ यापैकी जी तारीख लवकर असेल त्या तारखेच्या आत सहभागी व्हायचे आहे. पूर्व हंगामी ऊस पिकासाठी लागणीपासुन एक महिना किंवा डिसेंबर २०१४ तसेच ऊस खोडवाकरिता ३१ मे २०१५ व सुरु ऊसाकरिता ३१ मार्च २०१५ पर्यंत सहभागी व्हायचे आहे.
पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून वैयक्तीक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तीकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे त्या संबंधीत वित्तीय संस्थेस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त अधिसूचीत पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विभाग कंपनीने जिल्हा महसूल कार्यालयाच्या मदतीने नुकसान भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. सदर योजना पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आधारीत असून, हवामान आधारीत पीक विमा योजनेचा या योजनेशी संबंधीत नसल्याचे माहितीपत्रकात नमुद केले आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Discounts to farmers under National Agriculture Crop Insurance Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.