शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

भाजप सरकारकडून युवकांच्या पदरात पडली निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:48 IST

दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही.

ठळक मुद्देसंग्राम कोते पाटील यांचे प्रतिपादन : सरकारला घेरण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे भाजप सरकार कडून युवकांची घोर निराशा झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले.सेवाग्राम येथील आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर रायुकॉ विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, राकॉ जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, उपाध्यक्ष प्रा. खलील खतीब, महिला अध्यक्ष शरयु वांदिले, माजी रायुकॉ जिल्हाध्य संदीप किटे, रायुका जिल्हाध्यक्ष राहुल घोडे उपस्थित होते. कोते म्हणाले की, युवक वणवण फिरतो आहे. मात्र त्याचा हाताला काम नसल्याने निराशेच्या गर्तेत जातो आहे. शासन मात्र आपल्या जाहिराती करण्यात मश्गुल आहे. युवकांच्या हिताचे कुठलेही निर्णय या चार वर्षात घेतले नाही. युवकांची चौफेर निराशा होते आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. युवकांच्या हिताचे निर्णय न घेतल्यास शासनाला स्वस्थ बसू देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. एक बुथ पंधरा युथ असे धोरण पक्षाने तयार केले असून बुथ समिती स्थापन करण्यावर युवकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. युवकांच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करून संघटनेची बांधणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यात शाखा स्थापन करणे, बुथ कमिट्या तयार करणे हे कार्य येत्या दोन ते तीन महिन्यात पदाधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी संग्राम गावंडे यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करून युवक हा पक्षाचा महत्वाचा भाग असल्याचे सांगितले. चांगले युवक पक्षाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे असे मत गावंडे यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात सुनिल राऊत यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. वेळोवेळी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका पक्ष घेत असून विविध आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मांडण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमदरम्यान वर्धेत प्रथम आगमन निमित्य संग्राम कोते पाटील यांचा चरखा व सुतमाला देवून युवक कॉँग्रेस वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. संचालन व आभार प्रा. खलील खतीब यांनी केले. कार्यक्रमाला अंबादास वानखेडे, अशोक निस्ताणे, संदेश किटे, अर्चित निघडे, अजित ठाकरे, शुभम झाडे, सागर शिंदे, सुयोग बिरे, नयन खंगार, मंगेश गावंडे, किशोर झगडकर, प्रणय राऊत, विनय मुन, मोहन काळे, संकेत निस्ताणे, विक्की खडसे, इन्जमाम खतीब व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सारेच घटक नाराजदेशात भाजपसरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. या सरकारपासून शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, युवक, विद्यार्थी, कामगार, उद्योजक, नौकरदार हे सारेच घटक नाराज आहेत. कॉँग्रेस, राकॉँच्या सरकारच्या काळातील योजनाच राबविल्या जात असून त्याचे केवळ मार्केटींग सुरू आहे. असा टोलाही संग्राम कोते पाटील यांनी लगावला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा