शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

भाजप सरकारकडून युवकांच्या पदरात पडली निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:48 IST

दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही.

ठळक मुद्देसंग्राम कोते पाटील यांचे प्रतिपादन : सरकारला घेरण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी युवकांना एक कोटी रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे आमिष देत भाजपने सत्ता मिळविली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटून ही युवकांच्या हाताला काम मिळाले नाही. एक कोटी तर दुरच पाच लाख युवकांना सुध्दा या शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे भाजप सरकार कडून युवकांची घोर निराशा झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले.सेवाग्राम येथील आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर रायुकॉ विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, राकॉ जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, उपाध्यक्ष प्रा. खलील खतीब, महिला अध्यक्ष शरयु वांदिले, माजी रायुकॉ जिल्हाध्य संदीप किटे, रायुका जिल्हाध्यक्ष राहुल घोडे उपस्थित होते. कोते म्हणाले की, युवक वणवण फिरतो आहे. मात्र त्याचा हाताला काम नसल्याने निराशेच्या गर्तेत जातो आहे. शासन मात्र आपल्या जाहिराती करण्यात मश्गुल आहे. युवकांच्या हिताचे कुठलेही निर्णय या चार वर्षात घेतले नाही. युवकांची चौफेर निराशा होते आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. युवकांच्या हिताचे निर्णय न घेतल्यास शासनाला स्वस्थ बसू देणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. एक बुथ पंधरा युथ असे धोरण पक्षाने तयार केले असून बुथ समिती स्थापन करण्यावर युवकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. युवकांच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करून संघटनेची बांधणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यात शाखा स्थापन करणे, बुथ कमिट्या तयार करणे हे कार्य येत्या दोन ते तीन महिन्यात पदाधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी संग्राम गावंडे यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करून युवक हा पक्षाचा महत्वाचा भाग असल्याचे सांगितले. चांगले युवक पक्षाच्या प्रवाहात सामील झाले पाहिजे असे मत गावंडे यांनी व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात सुनिल राऊत यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. वेळोवेळी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका पक्ष घेत असून विविध आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या मांडण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमदरम्यान वर्धेत प्रथम आगमन निमित्य संग्राम कोते पाटील यांचा चरखा व सुतमाला देवून युवक कॉँग्रेस वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. संचालन व आभार प्रा. खलील खतीब यांनी केले. कार्यक्रमाला अंबादास वानखेडे, अशोक निस्ताणे, संदेश किटे, अर्चित निघडे, अजित ठाकरे, शुभम झाडे, सागर शिंदे, सुयोग बिरे, नयन खंगार, मंगेश गावंडे, किशोर झगडकर, प्रणय राऊत, विनय मुन, मोहन काळे, संकेत निस्ताणे, विक्की खडसे, इन्जमाम खतीब व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सारेच घटक नाराजदेशात भाजपसरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे. या सरकारपासून शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, युवक, विद्यार्थी, कामगार, उद्योजक, नौकरदार हे सारेच घटक नाराज आहेत. कॉँग्रेस, राकॉँच्या सरकारच्या काळातील योजनाच राबविल्या जात असून त्याचे केवळ मार्केटींग सुरू आहे. असा टोलाही संग्राम कोते पाटील यांनी लगावला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा