शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

‘धाम’च्या पाण्याची गळती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली.

ठळक मुद्देयेळाकेळी येथील प्रकार : ३६ हजार कुटुंबीयांच्या तृष्णातृप्तीसाठी ठरतोय उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. परंतु, याच प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे येळाकेळी येथील धाम उन्नई बंधाºयातून वाहून जात आहे. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात वर्धावासीयांना जल संकटाला तोड द्यावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली. वेळोवेळी काम हाती घेऊन वितरण प्रणालीचे काम पूर्ण करण्यात आल्याने सुमारे ९५ हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. शिवाय धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाणी येळाकेळी येथील धाम उन्नई बंधारा येथे अडविले जाते. तेथून वर्धा नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धामच्या पाण्याची उचल करते. परंतु, याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. सुमारे एक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थेच असल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्वयंचलित बोडबोल गेटचे रबर सील बदलविण्याकडे दुर्लक्षयेळाकेळी येथील धाम उन्नई बंधाऱ्याची उंची नदी तळापासून ८.६० मीटर तर लांबी ११८.५० मीटर आहे. बंधाºयामध्ये १६ स्वयंचलित गोडबोल गेट बसविण्यात आले आहे. या बंधाऱ्यातून बिगर सिंचनासाठी पाणी वापर केले जाते. प्रत्येक चार वर्षांनंतर गेटचे रबर सील बदलविणे गरजेचे होते. परंतु, यांत्रिकी विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, रबर सील व्यवस्थित नसल्याने सध्या या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात आहे.आठ लाखांचा निधी; पण काम शून्ययेळाकेळी येथील धाम उन्नई बंधाराच्या दुरुस्तीसाठी तब्बल आठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित धोरणाचा अवलंब केल्या जात आहे. बंधाऱ्यातून सुरू असलेली पाणी गळती वेळीच दुरूस्तीचे काम हाती घेऊन थांबविली नाही तर यंदाही नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.पत्रव्यवहारांकडे कानाडोळाधाम उन्नई बंधाऱ्यातून धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी वाहून जात असल्याने दुरुस्तीबाबत वर्धा पाटबंधारे विभागाकडून यांत्रिकी विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आले; पण त्या पत्रांनाही केराची टापली दाखविली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यंदा या प्रकरणी काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर यांत्रिकी विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी अधीक्षक अभियंता आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात