शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘धाम’च्या पाण्याची गळती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली.

ठळक मुद्देयेळाकेळी येथील प्रकार : ३६ हजार कुटुंबीयांच्या तृष्णातृप्तीसाठी ठरतोय उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. परंतु, याच प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे येळाकेळी येथील धाम उन्नई बंधाºयातून वाहून जात आहे. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात वर्धावासीयांना जल संकटाला तोड द्यावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली. वेळोवेळी काम हाती घेऊन वितरण प्रणालीचे काम पूर्ण करण्यात आल्याने सुमारे ९५ हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. शिवाय धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाणी येळाकेळी येथील धाम उन्नई बंधारा येथे अडविले जाते. तेथून वर्धा नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धामच्या पाण्याची उचल करते. परंतु, याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. सुमारे एक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थेच असल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्वयंचलित बोडबोल गेटचे रबर सील बदलविण्याकडे दुर्लक्षयेळाकेळी येथील धाम उन्नई बंधाऱ्याची उंची नदी तळापासून ८.६० मीटर तर लांबी ११८.५० मीटर आहे. बंधाºयामध्ये १६ स्वयंचलित गोडबोल गेट बसविण्यात आले आहे. या बंधाऱ्यातून बिगर सिंचनासाठी पाणी वापर केले जाते. प्रत्येक चार वर्षांनंतर गेटचे रबर सील बदलविणे गरजेचे होते. परंतु, यांत्रिकी विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, रबर सील व्यवस्थित नसल्याने सध्या या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात आहे.आठ लाखांचा निधी; पण काम शून्ययेळाकेळी येथील धाम उन्नई बंधाराच्या दुरुस्तीसाठी तब्बल आठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित धोरणाचा अवलंब केल्या जात आहे. बंधाऱ्यातून सुरू असलेली पाणी गळती वेळीच दुरूस्तीचे काम हाती घेऊन थांबविली नाही तर यंदाही नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.पत्रव्यवहारांकडे कानाडोळाधाम उन्नई बंधाऱ्यातून धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी वाहून जात असल्याने दुरुस्तीबाबत वर्धा पाटबंधारे विभागाकडून यांत्रिकी विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आले; पण त्या पत्रांनाही केराची टापली दाखविली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यंदा या प्रकरणी काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर यांत्रिकी विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी अधीक्षक अभियंता आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात