शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘धाम’च्या पाण्याची गळती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली.

ठळक मुद्देयेळाकेळी येथील प्रकार : ३६ हजार कुटुंबीयांच्या तृष्णातृप्तीसाठी ठरतोय उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्प वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांमधील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. परंतु, याच प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे येळाकेळी येथील धाम उन्नई बंधाºयातून वाहून जात आहे. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात वर्धावासीयांना जल संकटाला तोड द्यावे लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात आले. शिवाय १९८७ पासून सिंचनास सुरूवात झाली. वेळोवेळी काम हाती घेऊन वितरण प्रणालीचे काम पूर्ण करण्यात आल्याने सुमारे ९५ हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. शिवाय धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाणी येळाकेळी येथील धाम उन्नई बंधारा येथे अडविले जाते. तेथून वर्धा नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धामच्या पाण्याची उचल करते. परंतु, याच बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. सुमारे एक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थेच असल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्वयंचलित बोडबोल गेटचे रबर सील बदलविण्याकडे दुर्लक्षयेळाकेळी येथील धाम उन्नई बंधाऱ्याची उंची नदी तळापासून ८.६० मीटर तर लांबी ११८.५० मीटर आहे. बंधाºयामध्ये १६ स्वयंचलित गोडबोल गेट बसविण्यात आले आहे. या बंधाऱ्यातून बिगर सिंचनासाठी पाणी वापर केले जाते. प्रत्येक चार वर्षांनंतर गेटचे रबर सील बदलविणे गरजेचे होते. परंतु, यांत्रिकी विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, रबर सील व्यवस्थित नसल्याने सध्या या बंधाऱ्यातून पाणी वाहून जात आहे.आठ लाखांचा निधी; पण काम शून्ययेळाकेळी येथील धाम उन्नई बंधाराच्या दुरुस्तीसाठी तब्बल आठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित धोरणाचा अवलंब केल्या जात आहे. बंधाऱ्यातून सुरू असलेली पाणी गळती वेळीच दुरूस्तीचे काम हाती घेऊन थांबविली नाही तर यंदाही नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.पत्रव्यवहारांकडे कानाडोळाधाम उन्नई बंधाऱ्यातून धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी वाहून जात असल्याने दुरुस्तीबाबत वर्धा पाटबंधारे विभागाकडून यांत्रिकी विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आले; पण त्या पत्रांनाही केराची टापली दाखविली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यंदा या प्रकरणी काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूर यांत्रिकी विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी अधीक्षक अभियंता आत्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात