शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देवळी व आर्वीत गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:24 AM

विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा

आॅनलाईन लोकमतवर्धा : विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला. तर दुपारी देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव) तर आर्वी तालुक्यातील विरूळ, रसुलाबाद, रोहणा येथे गारपीट झाली. गारपीट वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकºयांचे चांगलेच नुकसान झाले. तर वर्धा व खरांगणा परिसरात मुसळधार पाऊस आला.नाचणगाव येथे गारपीटांमुळे शेती पांढरी झाल्याचे दिसून येते आहे. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन आल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. कालपर्यंत पावसाचा फटका बसल्याचे बोलले जात असताना आज झालेल्या गारपीटीमुळे शेतकरी पुरता अडवणीत सापडला आहे. आज पहाटेच्या सुमारास आलेला पाऊस आणि गारपीटीमुळे शेतातील उभा गहू झोपला. गारींच्या माऱ्याने चण्याच्या घाट्या फुटल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. यामुळे अवकाळी पावसाचा या कापूस उत्पादकांनाही फटका बसला.आपटी परिसरात नागरिकांच्या घरासमोर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. या भागात आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास पडलेल्या या गारपीटीमुळे रस्ते पांढरे झाले होते. तर पुलगावात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.जिल्ह्यात यंदाच्या रबी हंगामात २० हजार ४९९ हेक्टर वर गहू तर ४०,२३६ हेक्टरवर चणा पिकाची लागवड करण्यात आल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या सुचना प्राप्त होताच कृषी विभाग झालेल्या नुकसानीची आकडेवारी गोळा करण्यासाठी लागले आहे.४५८ गावांतील बत्ती झाली होती गुलया वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५८ फिडरवरील वीज पुरवठ्यात बिघाड आला होता. यामुळे जिल्ह्यातील ४५८ गावांतील बत्ती गुल झाली होती. यात विरूळ, पुलगावसह इतर भागातील बत्तीही गुल झाली होती. या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. तर सकाळपासूनच दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी सध्या २२ गावातील अडचण शोधण्याचे काम वीज वितरणकडून सुरू आहे. ही दुरूस्ती होण्याकरिता आणखी किती काळ लागेल, हे सांगणे कठीण आहे.माहिती घेण्याकरिता सर्वेक्षण करण्याच्या सूचनाअवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतांना बराच फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला. यात शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले याची माहिती घेण्याकरिता सर्व्हे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. ही माहिती देण्यात देवळी तालुका पहिला ठरला असून येथे ५०५ हेक्टरमधील गहू तर ६३ हेक्टरमधील चणा पिकांचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.आणखी दोन दिवस धोकाजिल्ह्यात आणखी दोन दिवस वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर असलेले साहित्य झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.