शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:12 IST

‘अच्छे दिन आयेंगे’ चा नारा देऊन देशात मोदी सरकार सत्तवर आले. मागील ४ वर्षात या सरकारने कामगार कर्मचाºयांविरोधी सेवा विषयक व कायदे विषयक तरतुदीसंदर्भात जे धोरण अवलंबिले आहे.

ठळक मुद्देदेशव्यापी संपाला पाठिंबा : दोन दिवसीय आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘अच्छे दिन आयेंगे’ चा नारा देऊन देशात मोदी सरकार सत्तवर आले. मागील ४ वर्षात या सरकारने कामगार कर्मचाऱ्यांविरोधी सेवा विषयक व कायदे विषयक तरतुदीसंदर्भात जे धोरण अवलंबिले आहे. त्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशातील ११ प्रमुख कामगार संघटना व देशातील केंद्र व राज्य सरकार मधील सर्व संघटनांनी ८ व ९ जानेवारीला देशव्यापी संप पुकारला आहे. त्या संपाला पाठींबा दर्शवित राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.जुनी पेंशन योजना सर्वांना लागू करा, सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचाºयांच्या सेवा नियमित करा, कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्या, किमान वेतन १८ हजार रुपये करा, सर्व कामगार कर्मचाºयांना सार्वत्रिक व सामाजिक सुरक्षा लागू करा, सर्वाना बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू करा, कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धार्जिण बदल मागे घ्या, राज्य पातळीवरील राज्य कर्मचाºयांचे सर्व प्रलंबित प्रश्न त्वरीत सोडवा, रिक्त पदे, अनुकंपा तत्वावरील पदे भरा या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात राज्यातील समन्वय समितीच्या १७ लाख कर्मचाºयांनी ७, ८ व ९ आॅगस्ट दरम्यान तीन दिवस राज्यव्यापी संप पुकारला होता. या संपाच्या पार्श्वभूमिवर शासन स्तरावर या मागण्यांसदर्भात कार्यवाही सुरु असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ व ९ जानेवारीला संप न करता या दोन दिवस महाराष्ट्रात राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करुन देशव्यापी संपास पाठिंबा द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वर्धा जिल्ह्यात दुपारी २ ते ३ या वाजता दरम्यान जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय तर तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच.एम.लोखंडे, सरचिटणीस विनोद भालतडक व इतर पदाधिकाºयांनी आंदोलनाची भूमिका मांडली. आंदोलनात राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी नितीन तराळे, बाबासाहेब भोयर, ओंकार धावडे, आनंद मून, अतुल जाधव, सुप्रिया गिरी, पुनम मडावी, सरिता देशकर, बर्धिया, भोमले, मानेकर, संजय काटपातळ, रेणुका पायल, पदुळकर, लबासे, लंगडे, भोयर, धोटे यांच्यासह राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या आंदोलनानंतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदनही सादर केले.

टॅग्स :Strikeसंप