सदोष पूल बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:03+5:30

सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे.

Damage to farmers due to faulty bridge construction | सदोष पूल बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सदोष पूल बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

ठळक मुद्देनिम्न वर्धा कालवा परिसर : आमदारांनी जाणली शेतकऱ्यांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सालोड- माळेगांव-वडद मार्गावर असलेल्या शेत जमिनीवरून निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. परिसरातील नाल्यावरून कालवा गेल्याने निम्न वर्धा कालवे विभागाकडून पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु पुलाची निर्मिती सदोष असल्याने लगतच्या शेतकऱ्यांची शेतजमीन संकटात आली आहे.
सालोड क्षेत्रातील बाळापूर येथील कालव्यावरील पुलामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष मौक्यावर जाऊन पुलाची पाहणी करीत आमदार दत्तक गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या. पुल बांधताना विभागाने दोन छोटे पाईप टाकले आहे. नाल्याची खोली व रूंदी अधिक असल्याने या छोटया पाईप मधून पाण्याचा निचरा होताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्यासोबतच काडी कचरा देखील वाहत आला. परंतु पाईप छोटे असल्याने हा कचरा पाईपच्या मुखाशी अडकल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात देखील पाणी जमा झाल्याने त्यांचे नुकसान झाले. गत वर्षी सुद्धा असाच प्रकार घडल्याने अंकुश झाडे यांचे प्रचंड नुकसान झाले होते. कालव्यावरील पुल सदोष असल्याने त्याची दुरूस्ती करून मोठे पाईप टाकण्यात यावे अथवा नव्याने पुल बांधण्यात यावा,अशी मागणी शेतकऱ्यांसह भागोदय पाणी वापर संस्था, बाळापूर कार्यकारी अभियंता निम्न वर्धा कालवे विभाग यांच्याकडे केली होती. यावर संबधित विभागाने पाणी जमा होणार नसल्याचे संबधितांना कळविले होते.परंतु पाणी अडल्याने पीडित शेतकºयांना आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह संबधित विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी व पाणी वाटप संस्थेने पाठपुरावा करून देखील संबधित विभाग डोळेझाक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार डॉ.पंकज भोयर यांना भेटी दरम्यान सांगितले.आमदार भोयर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन शेतकºयांच्या कैफियत ऐकून घेतली. याबाबत संबधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भोयर यांनी दिले. यावेळी भाजपचे माजी तालुका प्रमुख आशिष कुचेवार,पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष मोतीराम टिपले, बालू सागरे ,मारोतराव वैतागे, संदीप झाडे, विनोद महाकाळकर, माणिक हजारे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: Damage to farmers due to faulty bridge construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी