शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:55 IST

तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले.

ठळक मुद्देवीजपुरवठा ठप्प : निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले. यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन पिकाला तडाखा बसला असून दुर्गा उत्सव मंडळांची तारांबळ उडाली. वादळामुळे परिसरातील वीज पुरवठा २४ तास खंडित होता.मंगळवारला सायंकाळी अचानक वादळासह आलेल्या तुफानी पावसाने शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यावर्षी कापसाच्या भरघोस उत्पन्नाची अशा बाळगून बसलेल्या शेतकºयांचा या पावसामुळे फटका बसला आहे. एका तासात २४.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर या मोसमात आतापर्यंत ७३८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १०२९.६ मि.मी. इतका पाऊस झाला होता.पाऊस आणि वादळामुळे जाम मार्गावरील येथील राधानगरीत टॉवर लाईनची तार जिवंत तार खाली पडली. विद्युत मंडळाच्या पॉवर हाऊसच्या मागे ५० वर्ष जुने असलेले झाड उन्मळून पडले. वाघेडा रोडवरील झाड पडल्याने वीज खांब कोसळला. तसेच दहेगाव रोड, वाघेडा रोड, तहसील कार्यालय परिसरातील अनेक झाड वादळामुळे कोसळले. काही झाडांच्या फांद्या तुटल्या.काही घरावरील टिनेपत्रे उडाली तर कुठे घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती आहे. या नुकसानीची माहिती मिळताच तहसीलदार दीपक कारंडे यांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या पावसाचा फटका समुद्रपूर येथील दुर्गा उत्सव मंडळाला बसला आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, अशोक वांदीले, महेश झोटींग, रामदास उमरेडकर, शालिक वैद्य आदींनी केले आहे.उमेदवारांची धावपळआगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने उमेदवारांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे काही उमेदवरांनी हिंगणघाट येथे जात आॅनलाईन अर्ज भरले. यात त्यांची चांगलीच धावपळ झाली. तर काही ठिकाणी पावसामुळे नवरात्रीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.आर्वी मार्गावरील वाहतूक प्रभावीतचआकोली - तीन दिवसांपुर्वी आलेल्या वादळी पावसामुळे वर्धा-आर्वी मार्गावरील बारूद कारखान्याजवळ असलेले बाभळीचे झाड पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. मात्र हे झाड उचलून बाजुला करण्याची तसदी अद्याप बांधकाम विभागाने घेतली नाही. त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी कायम आहे.रस्त्याच्या बाजुची अवैध वृक्षतोड असो की, रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार बांधकाम उपविभाग, आर्वी हा नेहमी चर्चेत असतो. तीन दिवसापूर्वी आलेल्या वादळात आर्वी, मासोद, मार्गावरील अनेक मोठमोठी वृक्ष धराशाही झाले आहे. यातील बहुतांश झाडे खरांगणा पोलिसांनी बाजुला करून रस्ता वाहतूक सुरळीत केली. ठाणेदरांनी रस्त्यावर आडवी पडलेली झाडे उचलून बाजुला करण्याबाबत बांधकाम विभाग कार्यालय आर्वी येथे कळविले. पण अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही.सामान्य वाहन चालकांना यात नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून वाहन कसे काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य मार्गावर पडलेल्या बाभळीच्या झाडाने रस्ता व्यापला आहे. कार्यकारी अभियंता यांनी संबंधीत अडचणीची दखल घेवून पडलेले झाड बाजुला करण्याच्या सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे.