शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

वादळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:55 IST

तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले.

ठळक मुद्देवीजपुरवठा ठप्प : निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले. यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन पिकाला तडाखा बसला असून दुर्गा उत्सव मंडळांची तारांबळ उडाली. वादळामुळे परिसरातील वीज पुरवठा २४ तास खंडित होता.मंगळवारला सायंकाळी अचानक वादळासह आलेल्या तुफानी पावसाने शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यावर्षी कापसाच्या भरघोस उत्पन्नाची अशा बाळगून बसलेल्या शेतकºयांचा या पावसामुळे फटका बसला आहे. एका तासात २४.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर या मोसमात आतापर्यंत ७३८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १०२९.६ मि.मी. इतका पाऊस झाला होता.पाऊस आणि वादळामुळे जाम मार्गावरील येथील राधानगरीत टॉवर लाईनची तार जिवंत तार खाली पडली. विद्युत मंडळाच्या पॉवर हाऊसच्या मागे ५० वर्ष जुने असलेले झाड उन्मळून पडले. वाघेडा रोडवरील झाड पडल्याने वीज खांब कोसळला. तसेच दहेगाव रोड, वाघेडा रोड, तहसील कार्यालय परिसरातील अनेक झाड वादळामुळे कोसळले. काही झाडांच्या फांद्या तुटल्या.काही घरावरील टिनेपत्रे उडाली तर कुठे घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती आहे. या नुकसानीची माहिती मिळताच तहसीलदार दीपक कारंडे यांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या पावसाचा फटका समुद्रपूर येथील दुर्गा उत्सव मंडळाला बसला आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, अशोक वांदीले, महेश झोटींग, रामदास उमरेडकर, शालिक वैद्य आदींनी केले आहे.उमेदवारांची धावपळआगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने उमेदवारांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे काही उमेदवरांनी हिंगणघाट येथे जात आॅनलाईन अर्ज भरले. यात त्यांची चांगलीच धावपळ झाली. तर काही ठिकाणी पावसामुळे नवरात्रीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.आर्वी मार्गावरील वाहतूक प्रभावीतचआकोली - तीन दिवसांपुर्वी आलेल्या वादळी पावसामुळे वर्धा-आर्वी मार्गावरील बारूद कारखान्याजवळ असलेले बाभळीचे झाड पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. मात्र हे झाड उचलून बाजुला करण्याची तसदी अद्याप बांधकाम विभागाने घेतली नाही. त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी कायम आहे.रस्त्याच्या बाजुची अवैध वृक्षतोड असो की, रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार बांधकाम उपविभाग, आर्वी हा नेहमी चर्चेत असतो. तीन दिवसापूर्वी आलेल्या वादळात आर्वी, मासोद, मार्गावरील अनेक मोठमोठी वृक्ष धराशाही झाले आहे. यातील बहुतांश झाडे खरांगणा पोलिसांनी बाजुला करून रस्ता वाहतूक सुरळीत केली. ठाणेदरांनी रस्त्यावर आडवी पडलेली झाडे उचलून बाजुला करण्याबाबत बांधकाम विभाग कार्यालय आर्वी येथे कळविले. पण अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही.सामान्य वाहन चालकांना यात नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून वाहन कसे काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य मार्गावर पडलेल्या बाभळीच्या झाडाने रस्ता व्यापला आहे. कार्यकारी अभियंता यांनी संबंधीत अडचणीची दखल घेवून पडलेले झाड बाजुला करण्याच्या सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे.