शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:55 IST

तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले.

ठळक मुद्देवीजपुरवठा ठप्प : निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील रेणकापूर, मुरादपूर, राळेगाव, लाहोरा, वाघोडा, दहेगाव, जाम, वायगाव (ह.) परिसराला मंगळवारी संध्याकाळी आलेल्या तुफानी पावसाने झोडपले. यामुळे शेतातील कापूस, सोयाबीन पिकाला तडाखा बसला असून दुर्गा उत्सव मंडळांची तारांबळ उडाली. वादळामुळे परिसरातील वीज पुरवठा २४ तास खंडित होता.मंगळवारला सायंकाळी अचानक वादळासह आलेल्या तुफानी पावसाने शेतातील कपाशीचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यावर्षी कापसाच्या भरघोस उत्पन्नाची अशा बाळगून बसलेल्या शेतकºयांचा या पावसामुळे फटका बसला आहे. एका तासात २४.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर या मोसमात आतापर्यंत ७३८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी १०२९.६ मि.मी. इतका पाऊस झाला होता.पाऊस आणि वादळामुळे जाम मार्गावरील येथील राधानगरीत टॉवर लाईनची तार जिवंत तार खाली पडली. विद्युत मंडळाच्या पॉवर हाऊसच्या मागे ५० वर्ष जुने असलेले झाड उन्मळून पडले. वाघेडा रोडवरील झाड पडल्याने वीज खांब कोसळला. तसेच दहेगाव रोड, वाघेडा रोड, तहसील कार्यालय परिसरातील अनेक झाड वादळामुळे कोसळले. काही झाडांच्या फांद्या तुटल्या.काही घरावरील टिनेपत्रे उडाली तर कुठे घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती आहे. या नुकसानीची माहिती मिळताच तहसीलदार दीपक कारंडे यांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या पावसाचा फटका समुद्रपूर येथील दुर्गा उत्सव मंडळाला बसला आहे. शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, अशोक वांदीले, महेश झोटींग, रामदास उमरेडकर, शालिक वैद्य आदींनी केले आहे.उमेदवारांची धावपळआगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. मात्र वादळामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याने उमेदवारांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे काही उमेदवरांनी हिंगणघाट येथे जात आॅनलाईन अर्ज भरले. यात त्यांची चांगलीच धावपळ झाली. तर काही ठिकाणी पावसामुळे नवरात्रीचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.आर्वी मार्गावरील वाहतूक प्रभावीतचआकोली - तीन दिवसांपुर्वी आलेल्या वादळी पावसामुळे वर्धा-आर्वी मार्गावरील बारूद कारखान्याजवळ असलेले बाभळीचे झाड पडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. मात्र हे झाड उचलून बाजुला करण्याची तसदी अद्याप बांधकाम विभागाने घेतली नाही. त्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी कायम आहे.रस्त्याच्या बाजुची अवैध वृक्षतोड असो की, रस्ता बांधकामातील भ्रष्टाचार बांधकाम उपविभाग, आर्वी हा नेहमी चर्चेत असतो. तीन दिवसापूर्वी आलेल्या वादळात आर्वी, मासोद, मार्गावरील अनेक मोठमोठी वृक्ष धराशाही झाले आहे. यातील बहुतांश झाडे खरांगणा पोलिसांनी बाजुला करून रस्ता वाहतूक सुरळीत केली. ठाणेदरांनी रस्त्यावर आडवी पडलेली झाडे उचलून बाजुला करण्याबाबत बांधकाम विभाग कार्यालय आर्वी येथे कळविले. पण अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही.सामान्य वाहन चालकांना यात नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून वाहन कसे काढावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य मार्गावर पडलेल्या बाभळीच्या झाडाने रस्ता व्यापला आहे. कार्यकारी अभियंता यांनी संबंधीत अडचणीची दखल घेवून पडलेले झाड बाजुला करण्याच्या सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे.