शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

अतिवृष्टीचे बळी; विदर्भात आणखी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 17:07 IST

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या संकटात आणखीच भर घातली.

आर्वी (वर्धा)/ गोंदिया/ भंडारा : अतिवृष्टीमुळे स्वप्नांवर पाणी फेरल्याने हताश झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आपले जीनव संपवले. आर्वी तालुक्याती उमरी (सुकळी) येथील शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून शेतातच विष प्राशन केले. त्यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोकराज मारोतराव कालोकार (४५, रा. उमरी (सुकळी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून यावर्षी अतिवृष्टीने सर्व पीक खरडून गेल्याने त्यांची शेती पडीक राहिली. तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मोरांगणा शाखेच्या बँक ऑफ इंडिया शाखेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. आता बँकेचे कर्ज वसुलीकरिता तगादा लावला होता तसेच यावर्षी शेती पडीक राहिल्याने उत्पन्नाची काहीच अपेक्षा नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. त्यामुळे लोकराज हे सतत चिंतेत असायचे. यातूनच त्यांनी २८ ऑक्टोबरला पुतण्याच्या शेतात जावून विष प्राशन केले.

ही बाब पुतण्या व कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरु असताना ३० ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या परिवारावर मोठे संकट ओढावले आहे.

गोंदिया जिल्ह्यात विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

आमगाव तालुक्यातील ग्राम जवरी येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. मदन बकाराम गायधने (४८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मदन गायधने यांनी अनेकांकडून उसने पैसे घेतले होते. त्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. आता माव्याने कहर केल्याने ते चिंताग्रस्त होते. यातच त्यांनी सतत होत असलेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच घरच्यांनी त्यांना आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

भंडाऱ्यात शेतकऱ्याने पीक नुकसानीला कंटाळून संपवले जीवन

खरिपात लागवडीखालील धान पीक पुराच्या पाण्याने नष्ट झाल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथील नर्सरी परिसरात सोमवारी सकाळी ५ च्या सुमारास उघडकीस आली. सीताराम महादेव शेंडे (६५, रा. भागडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सीताराम शेंडे यांचे भागडी ते मांढळ मार्गावरील नाल्यानजीक जवळपास दीड एकर शेतजमीन आहे. खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती. मात्र, मुसळधार पावसासह तब्बल तीनदा चुलबंद नदीसह नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शेती नाल्याच्या बाजूला असल्याने पुराचे पाणी शेतात शिरल्याने पीक नष्ट झाले. लागवडीखालील पिकांवर हजारो रुपये खर्च करून देखील पुराच्या पाण्याने पीक नष्ट झाल्याने शेंडे हे विवंचनेत होते. घटनेच्या दिवशी घरात कुणालाही न सांगता ते निघून गेले. चिचोली येथील नर्सरीतील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ