विनापरवानगी धावणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:12+5:30
जिल्ह्याच्या सीमा कोरोनाबाधित यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्याला लागून आहे. या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित वाहनचालकांना विनवणी केली जात आहे. परंतु याचा काही एक फायदा होत नसल्याने कडक पाऊले उचलने गरजेच झाले आहे.

विनापरवानगी धावणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : कोरोना संक्रमणात शासनाने जिल्हाबंदी लागू केली असताना काही जण चोरमार्गाने वर्धा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी ही बाब अतिशय घातक असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी शिरपूर चेकपोस्टला भेट देत सीमाबंदीचा आढावा घेतला. यावेळी चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली. विनापरवानगी ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहन चालकासोबतच मोटारसायकल स्वारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्याच्या सीमा कोरोनाबाधित यवतमाळ, नागपूर व अमरावती जिल्ह्याला लागून आहे. या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित वाहनचालकांना विनवणी केली जात आहे. परंतु याचा काही एक फायदा होत नसल्याने कडक पाऊले उचलने गरजेच झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचेशी चर्चा करून विनापरवानगी चारचाकी वाहनासोबतच मोटारसायकल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. डवले यांनी सांगितले. काही परप्रांतीय मजूर वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडून पायदळ आपल्या राज्यात जात आहे. ही बाब कोरोना आजाराचे संक्रमणासाठी घातक असल्याची गोष्ट आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवले यांचे कानी घातली. यावेळी जिल्हा सीमेवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी डॉ. डवले यांनी केले. सीमाबंदी पाहणी पथकात जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय दाढे, डॉ. कोमल कठाणे, शेख हुसेन, प्रमोद घुडे, शरद डांगरे, माधव कातकडे, गणेश चंदेल व विकास माणीकुकडे यांची उपस्थिती होती.