शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या समर्पणावरच देश जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:24 IST

आज देशात दहशतवाद, हिंसाचार वाढत आहे. देशाच्या सीमेवर देखील आज असुरक्षिततेचे वातावरण आहे. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारताचा जवान देशाचे रक्षण करीत आहे. परंतु, आपण त्याचा कधीच विचार करीत नाही. आपले आईवडील, मुलं-बाळ परिवार सोडून तो देशाच पर्यायाने आपले रक्षण करीत आहे.

ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ । पुलगाव केंद्रीय दारूगोळा भांडारात शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आज देशात दहशतवाद, हिंसाचार वाढत आहे. देशाच्या सीमेवर देखील आज असुरक्षिततेचे वातावरण आहे. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून भारताचा जवान देशाचे रक्षण करीत आहे. परंतु, आपण त्याचा कधीच विचार करीत नाही. आपले आईवडील, मुलं-बाळ परिवार सोडून तो देशाच पर्यायाने आपले रक्षण करीत आहे. या सैनिकांच्या समर्पणावरच देश जिवंत आहे, असे विचार अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडारात ३१ मे २०१६ रोजी झालेल्या अग्निस्फोटातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केले.शहीद दिन समारोह समितीद्वारे स्थानिक आर. के. हायस्कूलच्या शहीद स्मृती मंचावर आयोजित तिसऱ्या ‘एक शाम शहीदों के नाम’ या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, दारूगोळा भांडाराचे ले. कर्नल सिन्हा, ले. कर्नल सुमित शर्मा, ले. कर्नल पंकज शुक्ला, आर.के. हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष मोहन अग्रवाल, समारोह समितीचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, माजी सभापती मिलिंद भेंडे, सरपंच नीलिमा राऊत, पंंं.स. सदस्य दिलीप अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार कडू यांनी सैनिकांचा दर्जा श्रेष्ठ असल्याचे सांगितले. रामदास तडस म्हणाले, मे २०१६ ची ती काळरात्र माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणून मी या घटनेत शहीद झालेल्या सर्वच वीरांना शहिदांचा दर्जा मिळावा म्हणून लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. शहीद परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी शहीद स्मारकास मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहून मानवंदना दिली. कार्यक्रमात पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेले मलकापूर येथील संजय व नितीन हाडगे या शहीद परिवाराचा मार्इंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गडचिरोली येथील शहीद परिवारांनी मार्इंच्या छत्रछायेत असणाºया अनाथांच्या पालन-पोषणासाठी निधी गोळा करून मार्इंच्या स्वाधीन केला.अंध विद्यालयाने ‘एक शाम शहीदों के नाम’ कार्यक्रमातून देशभक्तीपर विविध गाणी सादर केली. या कार्यक्रमात देशातील विविध क्षेत्रातील शहीद परिवार सहभागी झाले होते. तर वर्धा येथील गोविंद व श्रीकांत राठी यांनी पुलवामा शहीद संजय राजपूत व नितीन हाडगे यांच्या परिवारास प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश देऊन सामाजिक बांधीलकीचा परिचय दिला. प्रास्ताविकातून समितीचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. आयोजनात इंडियन मिलिटरी स्कूलच्या भावी सैनिकांचे मोठे योगदान होते. कार्यक्रमाला शहरवासींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शहिदांच्या कुटुंबीयांचा सत्कारगडचिरोली येथे भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या अमृत बदाडे, साहुराज मडावी, प्रमोद भोयर, राजू गायकवाड, अभिमान रहाटे, किशोर बोभाटे, संजय खरडे, संतोष चव्हाण, दयानंतद दारोडे, रूपेश वालोदे, युगांदी मडावी या शहीद कुटुंबीयांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, साडी, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी एका शहीद पुत्रास हृदयाशी लावून वात्सल्याचा हात ठेवून त्याचा पापा घेतला, तेव्हा काही काळ वातावरण भावविभोर झाले होते.

टॅग्स :Soldierसैनिक