शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

समुपदेशक, कम्युनिटी पोलिसिंगवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्यपूर्ण काम पोलिसांना करावे लागणार आहे.

ठळक मुद्देउपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांचे मार्गदर्शन : पोलिसांचे वाढविले मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कायदा व सुव्यवस्था...गुन्ह्यााचा तपास... बंदोबस्त...वाहतुकीचे व्यवस्थापन आणि कायद्याबाबतचे प्रबोधन...हे म्हणजे पोलिसिंग... असेच आतापर्यंत रूढ झाले होते. मात्र, कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्यपूर्ण काम पोलिसांना करावे लागणार आहे.येणाऱ्या संकटकाळात कर्मचाऱ्यांनी खचून न जाता आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी मंगळवारी रात्री आर्वीनाका परिसरात पोलीस दलासह महसूल, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना आरोग्यदायी साहित्य वापरूनच रस्त्यावर उतरावे, तसेच स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.कायदा, सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे मोडून काढायचे. गुन्हे सिद्धता प्रमाणात वाढ होईल यासाठी प्रयत्न करायचे. सण, उत्सव शांततेत उत्साहात साजरे व्हावे, यासाठी बंदोबस्त, सामाजिक सलोखा राखणे, निवडणुका, सभांचा बंदोबस्त करायचा. महापूर काळात नागरिकांसह प्रशासनाला आवश्यक ती मदत करायची, असे पोलिसिंग सर्वांनीच पाहिले आहे. पण, कोरोनाचं संकट देशावर आले. एक दोन नव्हे तर तब्बल ४५ दिवसांपासून शहरातील पोलिसांची व्याख्याच बदलत गेली. गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांना आपल्या कामात मोठे बदल करावे लागले. अहोरात्र रस्त्यावर बंदोबस्त करताना नागरिकांच्या मनातील भीती दूर करायची. संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नका, असे त्यांचे वारंवार प्रबोधन, आवश्यक त्या ठिकाणी कारवाई, प्रबोधनाचे साधन अधिक वापरणे, पण, हे करताना कायदा, सुव्यवस्थेचा, सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेता पोलीस कर्तव्य बजावताना दिसत आहेत. जिल्ह्यात मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा रस्त्यावर आली. मागील ४५ दिवसांपासून २४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी त्यांचे समुपदेशन केले. आर्वीनाका चौकात संपूर्ण पोलीस दल, वाहतूक शाखेचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर तसेच फेसशिल्ड आदी आरोग्यविषयक यंत्रणा बाळगूनच काम करण्याचा सल्ला दिला. तुम्ही सुरक्षीत तर नागरिक सुरक्षीत असे सांगून त्यांचे मनोबल उंचावले. तसेच त्यांच्या कार्याला सलाम करीत अजून लांब लढाई लाढायची असल्याने तुम्ही सुरक्षीत राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, शहर ठाणेदार योगेश पारधी, वाहतूक शाखेचे अशोक चौधरी, आरोग्य विभागातील कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी, डॉ. सचीन पावडे आदींची उपस्थिती होती.कर्मचाऱ्यांना दिल्यात सूचनापोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत अतिदक्ष राहण्याच्या सूचना एसडीपीओ जगताप यांनी केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझर जवळ ठेवणे, मास्क शिल्ड वापरणे, नागरिकांच्या सुरक्षेचा भार पोलीस, आरोग्य, महसूल, नगर पालिका कर्मचाऱ्यांच्याच खांद्यावर असल्याने तुम्ही सुरक्षीत राहणे गरजेचे आहे, असे सांगत आवश्यक सूचना त्यांनी केल्या.‘खाकी’तील ‘वॉरिअर्स’ऑनड्युटी २४ तासलहान मुले, वयस्कर आई-वडील, सासू-सासरे, पती यासर्वांना सोडून महिला पोलीस कर्मचारी कोरोनाला हरविण्यासाठी मैदानात आहेत. कुणी गस्त घालत आहे, कुणी भर उन्हात चौकात पहारा देत आहे, तर कुणी कंट्रोल रूममध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. स्वत:चं कुटुंब विसरून या महिला ‘वारिअर्र्स’ गेल्या दीड महिन्यांपासून कर्तव्य बजावत आहेत.समुपदेशनासह निर्णयक्षमतापोलिसिंगमधील शेवटचा घटक हा रस्त्यावर बंदोबस्तासाठी असतो. त्याच्याकडे सामाजिकतेचे भान असावे, त्याच्याकडे जागेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी. तसेच गरज भासेल त्यावेळी पोलिसिंग करता करता समाजाचे समुपदेशन करण्याचे कौशल्यही असण्याची गरज आहे.मजूर कामगारांची काळजीसामाजिकतेचे भान ठेवून संसर्ग काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात सर्वात जास्त हाल हे कामगारांचे आणि परप्रांतीय कामगार घटकांचे होतात. त्यांना आपल्या गावी जाता येत नाही, हाताला काम नसल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होतो. आता पोलिसांना अशा घटकांसाठीही काम करावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस