शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

समुपदेशक, कम्युनिटी पोलिसिंगवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्यपूर्ण काम पोलिसांना करावे लागणार आहे.

ठळक मुद्देउपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांचे मार्गदर्शन : पोलिसांचे वाढविले मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कायदा व सुव्यवस्था...गुन्ह्यााचा तपास... बंदोबस्त...वाहतुकीचे व्यवस्थापन आणि कायद्याबाबतचे प्रबोधन...हे म्हणजे पोलिसिंग... असेच आतापर्यंत रूढ झाले होते. मात्र, कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक सलोखा राखत परिस्थितीचा सामना करण्याचे कौशल्यपूर्ण काम पोलिसांना करावे लागणार आहे.येणाऱ्या संकटकाळात कर्मचाऱ्यांनी खचून न जाता आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी मंगळवारी रात्री आर्वीनाका परिसरात पोलीस दलासह महसूल, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना आरोग्यदायी साहित्य वापरूनच रस्त्यावर उतरावे, तसेच स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.कायदा, सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे मोडून काढायचे. गुन्हे सिद्धता प्रमाणात वाढ होईल यासाठी प्रयत्न करायचे. सण, उत्सव शांततेत उत्साहात साजरे व्हावे, यासाठी बंदोबस्त, सामाजिक सलोखा राखणे, निवडणुका, सभांचा बंदोबस्त करायचा. महापूर काळात नागरिकांसह प्रशासनाला आवश्यक ती मदत करायची, असे पोलिसिंग सर्वांनीच पाहिले आहे. पण, कोरोनाचं संकट देशावर आले. एक दोन नव्हे तर तब्बल ४५ दिवसांपासून शहरातील पोलिसांची व्याख्याच बदलत गेली. गुन्हेगारीवर वचक ठेवणाऱ्या पोलिसांना आपल्या कामात मोठे बदल करावे लागले. अहोरात्र रस्त्यावर बंदोबस्त करताना नागरिकांच्या मनातील भीती दूर करायची. संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नका, असे त्यांचे वारंवार प्रबोधन, आवश्यक त्या ठिकाणी कारवाई, प्रबोधनाचे साधन अधिक वापरणे, पण, हे करताना कायदा, सुव्यवस्थेचा, सामाजिक सलोख्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेता पोलीस कर्तव्य बजावताना दिसत आहेत. जिल्ह्यात मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा रस्त्यावर आली. मागील ४५ दिवसांपासून २४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनी त्यांचे समुपदेशन केले. आर्वीनाका चौकात संपूर्ण पोलीस दल, वाहतूक शाखेचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर तसेच फेसशिल्ड आदी आरोग्यविषयक यंत्रणा बाळगूनच काम करण्याचा सल्ला दिला. तुम्ही सुरक्षीत तर नागरिक सुरक्षीत असे सांगून त्यांचे मनोबल उंचावले. तसेच त्यांच्या कार्याला सलाम करीत अजून लांब लढाई लाढायची असल्याने तुम्ही सुरक्षीत राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, शहर ठाणेदार योगेश पारधी, वाहतूक शाखेचे अशोक चौधरी, आरोग्य विभागातील कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी, डॉ. सचीन पावडे आदींची उपस्थिती होती.कर्मचाऱ्यांना दिल्यात सूचनापोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत अतिदक्ष राहण्याच्या सूचना एसडीपीओ जगताप यांनी केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझर जवळ ठेवणे, मास्क शिल्ड वापरणे, नागरिकांच्या सुरक्षेचा भार पोलीस, आरोग्य, महसूल, नगर पालिका कर्मचाऱ्यांच्याच खांद्यावर असल्याने तुम्ही सुरक्षीत राहणे गरजेचे आहे, असे सांगत आवश्यक सूचना त्यांनी केल्या.‘खाकी’तील ‘वॉरिअर्स’ऑनड्युटी २४ तासलहान मुले, वयस्कर आई-वडील, सासू-सासरे, पती यासर्वांना सोडून महिला पोलीस कर्मचारी कोरोनाला हरविण्यासाठी मैदानात आहेत. कुणी गस्त घालत आहे, कुणी भर उन्हात चौकात पहारा देत आहे, तर कुणी कंट्रोल रूममध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. स्वत:चं कुटुंब विसरून या महिला ‘वारिअर्र्स’ गेल्या दीड महिन्यांपासून कर्तव्य बजावत आहेत.समुपदेशनासह निर्णयक्षमतापोलिसिंगमधील शेवटचा घटक हा रस्त्यावर बंदोबस्तासाठी असतो. त्याच्याकडे सामाजिकतेचे भान असावे, त्याच्याकडे जागेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी. तसेच गरज भासेल त्यावेळी पोलिसिंग करता करता समाजाचे समुपदेशन करण्याचे कौशल्यही असण्याची गरज आहे.मजूर कामगारांची काळजीसामाजिकतेचे भान ठेवून संसर्ग काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात सर्वात जास्त हाल हे कामगारांचे आणि परप्रांतीय कामगार घटकांचे होतात. त्यांना आपल्या गावी जाता येत नाही, हाताला काम नसल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण होतो. आता पोलिसांना अशा घटकांसाठीही काम करावे लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस