शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला ६ हजार क्विंटलची प्रतीक्षा कायमच

By admin | Updated: February 20, 2017 01:09 IST

गतकाही दिवसांपासून कापसाचे दर वाढतील अशी चर्चा जोरात होती; ...

अनेकांचा कापूस घरीच : बाजारातील दर ५,७०० ते ५,८०० रुपये क्विंटलच्या घरातवर्धा : गतकाही दिवसांपासून कापसाचे दर वाढतील अशी चर्चा जोरात होती; मात्र शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आता त्या काळापासून असलेला कापसाचा दर आजही कायम आहे. तो वाढण्याची चिन्हे बाजारात नाही. आज बाजारात ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रुपये क्विंटलच्या आसपास कापसाचा दर आहे. हा दर वाढताना दिसत नसून शेतकऱ्यांची सहा हजारावर दराची आशा सध्या तरी अपूर्णच आहे.यंदा पावसाने ऐन हंगामात दडी मारल्याने कापसाचे दर चांगले राहतील अशी अपेक्षा होती. ती काही अंशी खरी ठरली. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांची यंदा भावाबाबत अधिक ओरड झाली नाही. कापूस उत्पादकांना मिळत असलेला दर बरा असल्याने त्यांनीही घरी कापूस ठेवण्याऐवजी तो बाजारात काढला. अशातच सरकीच्या दरात तेजी आल्याने मध्यंतरी काही काळ कापूस ५ हजार ९०० रुपयांवर पोहोचला; मात्र त्याउपर त्याचे दर जाण्याची चिन्हे नाहीत.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढण्याचे संकेत नसल्याचे कृषी तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सध्या मिळत असलेले कापसाचे दर सरकीच्या भावावर आधारीत आहे. ही तेजी आणखी किती दिवस राहील याचा नेम नाही. यामुळे असलेला भाव पुन्हा वाढेल की पडेल या बाबतही साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची कापसाला सहा हजार रुपये दराची प्रतीक्षा अद्याप तरी कायम असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट बाजारात कापसाला आजच्या स्थितीत ५ हजार ७०० रुपयाच्या आसपास दर मिळत आहे. हिच स्थिती वर्धा, आर्वी, देवळी व सेलू येथील बाजार समितीत आहे. यामुळे कापसाची सहा हजारावर जाण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा सध्या तरी धुसरच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी) शासकीय खरेदी शुन्यच बाजारात कापसाला मिळत असलेला दर हमीभावापेक्षा अधिक आहे. यामुळे शासकीय खरेदीचा अद्याप मुहूर्तही झाला नाही. कापूस पणन महासंघ आणि सीसीआयची खरेदी शुन्य असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. घराघरात कापसाच्या गंज्याजिल्ह्यातील काही सधन शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस अद्याप घरीच ठेवला आहे. त्यांना कापसाला येत्या दिवसात सहा हजार रुपयांवर दर मिळतील अशी अपेक्षा आहे. कापसाची कमी भावात विक्रीआष्टी (श.)- यावर्षी कापसाचे पीक समाधानकारक झाले आहे. शेतकऱ्यांना पैशाची चणचण असल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेत व्यापारी अगदी कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. आष्टी तालुक्यात तळेगाव येथे एकमेव कापूस खरेदी केंद्र आहे. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्याला घरून कापूस विकतात. शेतकऱ्यांकडून घेतलेला ५,२०० ते ५,५०० रुपयात घेतलेला कापूस व्यापारी बाजारात ६ हजार ते ६,५०० रुपयांत विकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे, शेतकऱ्यांनी हंगामाकरिता उसणे आणलेले पैसे देण्यासाठी उशीर होत असल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)