शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

शेतकºयांचा कापूस शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे.

ठळक मुद्देदर तर नाहीच;मजुरीही कंबर मोडणारीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस वेचून तो बाजारात विकाचा अशी प्रत्येक शेतकºयाची इच्छा आहे़; पण मजुरच मिळत नसल्याने त्यांची ही अपेक्षा हवेतच विरत आहे. मजुरांअभावी शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच पडून असल्याचे दिसत आहे.यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांची मोड झाली. त्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी पडली. सरकीला कोंंबे फुटली. यामुळे शेतकºयाचे चांगलेच नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर येते येवू लागला आहे. हा वेचण्याची तयारी कापूस उत्पादकांकडून होवू लागली असताना शेतकºयांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे.साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यंदा याला थोडा विलंब होईल असे वाटत होते. पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पºहाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे. मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजुरच मिळत नसल्याने शेतकºयांची चांगलीव गोची झाली आहे.काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकºयांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसनू आले आहे.वाढीव मजुरीसह ने-आण करण्याचाही खर्चशेतमजुरांच्या मजुरीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तुलनेत दर मात्र कमी आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंतेत असताना यात आणखी भर म्हणते मजुरांना ने आण करण्याचा खर्चही त्यांनाच करावा लागत आहे. परिणामी शेतकºयाच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकºयांच्या शेतात अजूनही सितदहीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढवर्धा जिल्ह्यात गत वर्षी ५ ते साडेपाच रुपये किलो वेचणीचा दर आता ९ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरिता ७०० ते ९०० रुपयांचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणाºया शेतकºयांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांना हा दर देणे शक्य आहे. पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाककुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.