शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

शेतकºयांचा कापूस शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे.

ठळक मुद्देदर तर नाहीच;मजुरीही कंबर मोडणारीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस वेचून तो बाजारात विकाचा अशी प्रत्येक शेतकºयाची इच्छा आहे़; पण मजुरच मिळत नसल्याने त्यांची ही अपेक्षा हवेतच विरत आहे. मजुरांअभावी शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच पडून असल्याचे दिसत आहे.यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांची मोड झाली. त्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी पडली. सरकीला कोंंबे फुटली. यामुळे शेतकºयाचे चांगलेच नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर येते येवू लागला आहे. हा वेचण्याची तयारी कापूस उत्पादकांकडून होवू लागली असताना शेतकºयांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे.साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यंदा याला थोडा विलंब होईल असे वाटत होते. पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पºहाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे. मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजुरच मिळत नसल्याने शेतकºयांची चांगलीव गोची झाली आहे.काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकºयांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसनू आले आहे.वाढीव मजुरीसह ने-आण करण्याचाही खर्चशेतमजुरांच्या मजुरीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तुलनेत दर मात्र कमी आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंतेत असताना यात आणखी भर म्हणते मजुरांना ने आण करण्याचा खर्चही त्यांनाच करावा लागत आहे. परिणामी शेतकºयाच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकºयांच्या शेतात अजूनही सितदहीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढवर्धा जिल्ह्यात गत वर्षी ५ ते साडेपाच रुपये किलो वेचणीचा दर आता ९ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरिता ७०० ते ९०० रुपयांचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणाºया शेतकºयांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांना हा दर देणे शक्य आहे. पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाककुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.