शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकºयांचा कापूस शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:54 IST

सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे.

ठळक मुद्देदर तर नाहीच;मजुरीही कंबर मोडणारीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन निघाले, कपाशीची बोंडे फुटल्याने हिरवे शेत पांढरे दिसत आहे. हा कापूस वेचून तो बाजारात विकाचा अशी प्रत्येक शेतकºयाची इच्छा आहे़; पण मजुरच मिळत नसल्याने त्यांची ही अपेक्षा हवेतच विरत आहे. मजुरांअभावी शेतकºयांचे पांढरे सोने शेतातच पडून असल्याचे दिसत आहे.यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांकरिता लाभाचा कमी त्रासाचाच अधिक राहिला. प्रारंभी पावसाने मारलेल्या दडीने अनेक कापूस उत्पादकांची मोड झाली. त्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. यातही उत्पादन निघण्याच्या काळात परतीच्या पावसाने कापूस ओला झाला. शिवाय दमट वातावरणामुळे बोंडे काळी पडली. सरकीला कोंंबे फुटली. यामुळे शेतकºयाचे चांगलेच नुकसान झाले. यात आता बोंडे फुटून कापूस बाहेर येते येवू लागला आहे. हा वेचण्याची तयारी कापूस उत्पादकांकडून होवू लागली असताना शेतकºयांना मजुरीच्या दराचा फटका बसत आहे.साधारणत: दिवाळीपासूनच कापसाचा हंगाम सुरू होतो. यंदा याला थोडा विलंब होईल असे वाटत होते. पण ज्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली त्यांच्या पºहाटीला कापूस आला आहे. या कापसामुळे शेत पांढरी दिसू लागली आहे. मात्र हा कापूस वेचण्याकरिता मजुरच मिळत नसल्याने शेतकºयांची चांगलीव गोची झाली आहे.काही भागात अद्यापही सोयाबीनची काढणी सुरू आहे. या काढीची मजुरी शेतकºयांकडून अधिक मिळत असल्याने कापूस वेचणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी शेतातील कापूस तसाच असल्याचे दिसनू आले आहे.वाढीव मजुरीसह ने-आण करण्याचाही खर्चशेतमजुरांच्या मजुरीत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तुलनेत दर मात्र कमी आहे. मजुरांची वाढीव मजुरी देण्याबाबत शेतकरी चिंतेत असताना यात आणखी भर म्हणते मजुरांना ने आण करण्याचा खर्चही त्यांनाच करावा लागत आहे. परिणामी शेतकºयाच्या खर्चात आणखीच वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीमुळे काही शेतकºयांच्या शेतात अजूनही सितदहीसाठी मजूर मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जमिनीच्या मशागतीचा खर्च, बियाणे, खते, आंतरमशागत, पीक काढणे हा सर्व खर्च वजा जाता नफा मिळतो की तोटा असा प्रश्न निर्माण झाला आहे.कापूस वेचणीत किलोमागे चार रुपयांची वाढवर्धा जिल्ह्यात गत वर्षी ५ ते साडेपाच रुपये किलो वेचणीचा दर आता ९ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे एक क्विंटल कापूस वेचण्याकरिता ७०० ते ९०० रुपयांचा खर्च पडत आहे. हा वाढीव भाव देणाºया शेतकºयांकडे मजुरांचा ओढा वाढत आहे. ज्यांच्याकडे सोय आहे त्यांना हा दर देणे शक्य आहे. पण ज्यांच्याकडे सोय नाही त्यांना हा भाव परवडणारा नाही. मजुरांना योग्य मजुरी दिली नाही तर कापूस तसाच शेतात राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या वाढत असलेली मजुरी आणि कापसाला मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे शेतकरी मेटाककुटीस आला आहे. यामुळे कापसाचा वेचा कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे.