शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:59 AM

हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देआताच नाही तर पूर्वीपासून सुरू आहे काम ‘स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ शहर’चे एक चांगले उदाहरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला. मोहिमही यशस्वी झाल्यात. गाव, शहर आणि वॉर्डाची साफ सफाई झाली; परंतु आता या मोहिमेची परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसत आहे. यावर मात करण्याकरिता शहरातील एका नगर सेवकाने आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतेचे कार्य स्वबळावर सुरू केले आहे. स्वत:च स्वच्छता करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम तो करीत आहे. केवळ फोटोसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी या आदर्शाचा कित्ता गिरविण्या सारखा असून एक आदर्श नगरसेवक असा असावा असे म्हणायला हरकत नसावी.प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. शासकीय स्वच्छता मोहीम झाल्यानंतर त्यांचे हे कार्य सुरूच आहे. विशेष असे की केवळ फोटो काढण्यासाठी सफाई केल्या जाते असे नाहीच. ही सेवा अनेक दिवसांपासून सातत्याने जैसे थे करण्याची गरज आहे. स्वच्छतेचे धडे घ्यावयाचे झाल्यास हे कार्य खरच प्रशंसनिय ठरते.पालिकेची यंत्रणा असताना ही स्वच्छता या व्यक्तीस का करावी लागते हा प्रश्न निर्माण होतो. मिळालेल्या माहितीनुसार या वॉर्डात नगर पालिकेद्वारे नाल्याची स्वच्छता नियमितरित्या पूर्णत: होत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही स्वच्छता पालिकेद्वारे नियमित होत नसल्याने गरजेच्या वेळी झाडू, फावडे घेवून नगरसेवक प्रकाश राऊत अस्वच्छता पाहून सेवा देतात. आणखी एक विशेष असे की हे ‘निवडणुका’ पाहून असे करीत तर नाही ना ? असा सवाल ही निर्माण होणे शक्य आहे. परंतु हे कार्य अलिकडेच करतात असे नव्हे तर त्यांची ही सेवा पूर्वीपासून सुरू आहे. दररोज सकाळी १०-११ वाजेपर्यंत स्वच्छतेची मोहीम स्वत: ते नियमित राबवितात.या वार्डातील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा माणस आहे. वॉर्डात मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची ते दक्षता घेत असल्याचे ते सांगतात.शासनाची स्वच्छता मोहीमही पालिकेद्वारेहिंगणघाट शहरात स्वच्छता मोहीम राबविल्या गेली. मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून राबविली. नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. त्या काळात स्वच्छतेच्या सुचनांचे पालन करुन घेण्याकरिता कधी सक्ती तर दंडात्मक कारवाई केली. यातून स्वच्छते विषयी जागृती करण्यात पालिका यशस्वी ठरली. आता ही मोहीम संपली असून त्यांचे चांगले परिणामही दिसत आहेत. परंतु गत काही दिवसांपासून शहरात अस्वच्छतेची सुरूवात झाल्याचे दिसते. पुन्हा हे शहर पूर्ववत अर्थात स्वच्छता मोहीमेपुर्वीचे शहर होवू नये अशीच अपेक्षा नागरिकांची आहे.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट