शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

वर्धा जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; विलगीकरणाचा आलेख चढताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 4:05 PM

कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने वर्धा जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

ठळक मुद्दे५३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात ४७५३१ व्यक्ती क्वारंटाईनमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोरोनाचा हाहाकार असतानाही वर्ध्यातील प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरविण्यास संधीच मिळाली नाही. परिणामी, राज्यभरात सर्वांत कमी रुग्णसंख्या वर्धा जिल्ह्यात आहे. येथे कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात, तर ११७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगार हिरावल्यामुळे अनेकांनी घराचा रस्ता धरला. जिल्ह्यातही तब्बल ५० हजार व्यक्ती बाहेर जिल्हा-राज्यातून दाखल झाल्या आहेत.

बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सोळावर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यावर भर दिला आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था नाही, अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ५२ हजार ८६० व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४७ हजार ५३१ व्यक्तींचा गृह विलगीकरणाचा कार्यकाळ संपला असून सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. सध्या ई-पासद्वारे जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून नागरिक क्वारंटाईन होण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेली एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास अख्खा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने इतर नागरिकांना विनाकारण १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याची वेळ येते. ही अडचण टाळण्यासाठी आता सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक, तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहे. त्यामुळे आता संस्थात्मक विलगीकरणाची आकडेवारीही वाढणार आहे.

४ हजार १८१ व्यक्तींची केली चाचणीकोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ४ हजार १८१ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४ हजार ११५ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ४ हजार ८० अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप ६६ अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यामध्ये १६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

११ व्यक्ती कोरोनामुक्तजिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांमुळे या महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये १६ रुग्ण आढळून आले असून त्यातील सर्वच रुग्ण बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत. यातील ११ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून तिघांवर जिल्ह्यात तर एकावर नागपुरात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या