शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

छतावर चाफ्याची २५ झाडे लावून तापमानाचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 11:44 IST

पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. किरण वैद्य यांनी प्रत्यक्ष कृतीतून पाणीबचत व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.

ठळक मुद्देजलबचत, पर्यावरण रक्षणाचा संदेशआरोच्या ‘वेस्टेज’ क्षारयुक्त पाण्याचेही नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: उन्हाळा सुरू झाला की जलबचत, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचे संदेश, पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतात परंतु; प्रत्यक्षात मात्र किती व्यक्ती ते कृतीत उतरवितात, हा संशोधनाचा विषय आहे. येथील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. किरण वैद्य यांनी प्रत्यक्ष कृतीतून पाणीबचत व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.प्रा. वैद्य हे स्वत: स्थापत्य अभियंता असून त्यांचे स्थानिक गांधी वॉर्डात निवासस्थान आहे. त्यांनी घरातील पाण्याचा एकही थेंब वाया जाणार नाही, याचे योग्य व पुरेपूर नियोजन केले आहे.शहरातील बहुतांश घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता आरओचा उपयोग केला जात आहे. याद्वारे पाण्याचे शुद्धीकरण होऊन उर्वरित साठ टक्के क्षारयुक्त पाणी वाया जाते. हा पाण्याचा फार मोठा अपव्यय आहे. हे पाणी वाया न घालविता उपयोगाकरिता योग्य नियोजन केले आहे. ‘आरओ’तून निघणारे क्षारयुक्त पाणी वाया न जाऊ देता ते थेट स्वतंत्र पाण्याच्या टाकीत जमा करण्याची व्यवस्था केली आहे. या पाण्याचा वापर भांडीकुंडी धुण्याकरिता व कूलरकरिता केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे.उन्हाळ्यात स्लॅबची घरे तापतात. त्यामुळे घरात उकाडा होतो. प्रामुख्याने शेवटच्या मजल्यावर राहणाऱ्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. यावर सुद्धा प्रा. वैद्य यांनी उपाय शोधला आहे. काँक्रिट छताचे तापमान ५० टक्क्यांवर आणण्यासाठी छतावार २५ प्लास्टिक ड्रममध्ये मोठी चाफ्याची झाडे लावली आहेत. ही झाडे वर्षभरात मोठी झाल्यावर तापमान कमी होईल, असे त्यांनी सांगितले.चाफ्याच्या खोडाचे वजन इतर झाडांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे मोठ्या झाडात त्याचे रूपांतर झाले तरी छतावार भार येणार नाही, घेरदारपणा असल्याने जास्त सावली छतावार पडते. तसेच सुगंधित फुले असलेल्या या झाडाचे स्वत:चेही सौंदर्य आहे. त्यामुळे सर्व दृष्टीने हे झाड छतावर लावण्याकरिता योग्य आहे, असे त्यांनी सांगितले.भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. उन्हाळ्यात विहिरी व कूपनलिकांना कोरड पडली आहे. याकरिता पावसाळ्यात पाण्याचे पुनर्भरण होणे आवश्यक आहे. प्रा. वैद्य यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून छतावरील पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडण्याची व्यवस्था केली आहे. प्रा. वैद्य यांनी आपल्या निवासस्थानी पाणीबचत व पर्यावरण संवर्धनाचे योग्य नियोजन केले असून समाजापुढे प्रत्यक्ष कृतीने आदर्श ठेवला आहे.

पाणीबचत व पर्यावणार्बाबत नागरिक उदासीनपाणीबचत व पर्यावणार्बाबत अद्याप नागरिक उदासीन आहेत, ही खंत प्रा वैद्य यांनी व्यक्त केली. पाणी बचतीचे गांभीर्य अनेक नागरिकांना कळलेले नाही. भर उन्हाळयात पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. इच्छाशक्ती असेल तर पाणीवापराचे योग्य नियोजन करून पाण्याची बचत केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. काळाची गरज ओळखून व भविष्याचा वेध घेऊन प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीचा संकल्प करावा, असे आवाहन प्रा. किरण वैद्य यांनी केले आहे.

टॅग्स :environmentवातावरण