शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पाणीपुरवठ्याची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:51 IST

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पाणी टंचाई आराखड्याचा टप्पा दोनमधील उपाययोजनेची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भिमनवार यांच्या अध्यतेखाली जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम जलाशयातील उपयुक्तसाठा ६८.४२० द.ल.घ.मी. असून एकूण तो साठवण क्षमतेच्या केवळ १३ टक्केच आहे. धाम प्रकल्पामध्ये ११.०२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याच पाण्याचा वर्धा शहर व लगतच्या गावामध्ये ३० जुनपर्यंत पुरवठा होणाहर आहे. ज्या गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते अशा गावांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देऊन तातडीने तपासणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे, अशाच ठिकाणी विंधन विहिरी करण्यात याव्या. इतरत्र कुठेही विंधन विहिरी करू नये, असा सूचना जिल्हाधिकारी भीमनवार यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ६०२ गावांमध्ये ९५४ उपाययोजना प्रस्थावित करण्यात आल्या आहेत. यात जानेवारी मार्च या दुसºया टप्प्यात १९९ नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली. तर एप्रिल ते जुन या तिसºया टप्प्यात १३७ नळ पाणीपुरवठा योजनाची कामे प्रस्तावित आहे. सदर योजनांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. १३५ गावातील टप्पा तीन मधील १३७ विशेष दुरुस्तीच्या कामाचे आराखडे व अंदाजपत्रक २५ मार्चपर्यंत सादर करावे. या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन प्राधान्याने टंचाईसदृश गावे घेण्यात यावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी