शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पाणीपुरवठ्याची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:51 IST

यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. तसेच पाणी टंचाई आराखड्याचा टप्पा दोनमधील उपाययोजनेची कामे ३० मार्चपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भिमनवार यांच्या अध्यतेखाली जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम जलाशयातील उपयुक्तसाठा ६८.४२० द.ल.घ.मी. असून एकूण तो साठवण क्षमतेच्या केवळ १३ टक्केच आहे. धाम प्रकल्पामध्ये ११.०२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याच पाण्याचा वर्धा शहर व लगतच्या गावामध्ये ३० जुनपर्यंत पुरवठा होणाहर आहे. ज्या गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते अशा गावांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देऊन तातडीने तपासणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे, अशाच ठिकाणी विंधन विहिरी करण्यात याव्या. इतरत्र कुठेही विंधन विहिरी करू नये, असा सूचना जिल्हाधिकारी भीमनवार यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ६०२ गावांमध्ये ९५४ उपाययोजना प्रस्थावित करण्यात आल्या आहेत. यात जानेवारी मार्च या दुसºया टप्प्यात १९९ नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली. तर एप्रिल ते जुन या तिसºया टप्प्यात १३७ नळ पाणीपुरवठा योजनाची कामे प्रस्तावित आहे. सदर योजनांचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. १३५ गावातील टप्पा तीन मधील १३७ विशेष दुरुस्तीच्या कामाचे आराखडे व अंदाजपत्रक २५ मार्चपर्यंत सादर करावे. या कामासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन प्राधान्याने टंचाईसदृश गावे घेण्यात यावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी