शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

६ वर्षांत वर्धा जिल्ह्यातील सूतगिरण्या, साखर कारखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:16 PM

विदर्भातील वर्धा जिल्ह्यात मागील सहा वर्षांत जवळपास ५ ते ७ उद्योग बंद पडल्याने १६ हजार कामगारांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे.

ठळक मुद्दे१६ हजार कामगारांना फटकासरकारचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आदींच्या नावाखाली औद्योगिक विकास झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात मागील सहा वर्षांत जवळपास ५ ते ७ उद्योग बंद पडल्याने १६ हजार कामगारांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे. या सर्व बाबींकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नागपूर पासून ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्यात १५ वर्षांपूर्वी ५ एक्सप्लोझिव्ह कारखान्यांमध्ये १० हजार कामगार कार्यरत होते. याशिवाय, जिल्ह्यात २ सहकारी सूतगिरण्या व एका साखर कारखान्यात ५ हजार कामगार काम करीत होते. मात्र, या सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे या कामगारांचाही रोजगार हिरावला गेला आहे.या उद्योगाच्या शेकडो एकरी जमीणी ओस पडल्या आहेत. काही जमिनींची विक्री करण्यात आली. मात्र, या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेण्यात आले नाही. सूतगिरण्या व साखर कारखाने हे राजकीय पुढाऱ्यांचे होते. यात सरकारचे भागभांडवल होते. हे उद्योग केवळ राजकीय लोकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद झालेत. आज जिल्ह्यातील बेरोजगारांना दुसरी कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे काही भूमिपुत्र पुन्हा शेती व्यवसायाकडे वळले आहेत. तर काही हे उद्योग सुरू होईल, अशी आशा बाळगून आहेत. यातील अनेक कामगारांचे पैसही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पडून आहेत. बँक बंद झाल्याने कामगार दुहेरी संकटात सापडले आहेत.वर्धा जिल्ह्यातील बंद उद्योगांची दारे उघडावी. दोनशे अमेरिकन कंपन्या चीन मधून भारतात येण्यास उत्सुक आहेत. वर्धा जिल्ह्यात बंद पडलेल्या उद्योगात त्यांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून, विदर्भातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.- सुधीर दंदे, सामाजिक कार्यकर्ते वर्धा

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने