शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

पाणीटंचाईतून मिळणार आता नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 18:00 IST

भूगर्भातील पाणीपातळीत ०.७२ मीटरने वाढ : नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूगर्भातील पाण्याची पातळी ०.७२ मीटरने वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. मागील काळात सर्वेक्षणासाठी ११२ विहिरीचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले होते. गत ४ वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात बऱ्यापैकी समाधानकारक पाऊस झाला. तर यंदाही मान्सून वेळीच दाखल होऊन निश्चितच समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज विविध प्रकारच्या हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आता पाणीटंचाईतून दिलासा मिळणार आहे.

यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात थोडा थोडा पाऊस कोसळला, यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कोठेतरी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जलाशयात समाधानकारक जलसाठा तयार झाला. अर्थात आष्टी तालुक्याची स्थिती चिंताजनक राहील, असेही भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात गंभीर जलसंकट आले होते, त्यावेळी वर्धा शहरासह तेरा गावासाठी खरांगणा येथील महाकाली धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याची अतिशय उचल करावी लागत होती. तसेच आर्वीच्या काही गावात तत्कालीन वेळी पाण्याची समस्या गंभीर बनली होती. चारही वर्ष वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत जास्तच पाऊस कोसळला होता शिवाय यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस झाल्याने ऑक्टोबर महिन्याच्या सर्वेक्षणाअंती भूगर्भातील अपेक्षित जलसाठा ०.४१ मीटरपर्यंत वाढला होता. मार्च व एप्रिल महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात मागील ५ वर्षाच्या तुलनेत यंदा ०.७२ मीटरने भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याचे पुढे आले आहे.

भूजल पातळीत झाली वाढभूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने झालेल्या सर्वेक्षणात वर्धा तालुक्यातील पाणी पातळी १.५५ मीटरने वाढली. आष्टी तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी ०.७९ मीटरने खालावली आहे. कारंजा तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी ०.१३ मिटरने वाढल्याचे सांगण्यात आले आहे. आर्वीच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर्षी आपल्या वर्धा जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी आष्टी वगळता सर्वच तालुक्यात वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पाणी हे आपले जीवन असून पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करून, दैनंदिन जीवनात पाण्याची काटकसर केली पाहिजे, आवश्यक तितकाच पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. भविष्यात पाणी आपल्याला जपून वापरावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने जीवनात संकल्प करून पाण्याचा आम्ही अपव्यय करणार नाहीत, अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे, भविष्यात आपल्याला पेट्रोलच्या भावात पाणी विकत घ्यावे लागेल, असे संकेत दिसून येत असले तरीही आजपासून आपण अतिरिक्त पाणी भूगर्भात जाण्यासाठी आपल्या घराच्या भागात गड्ढेकरून पाणी जमिनीत मुरवावे.- अविनाश टाके, सामाजिक कार्यकर्ते आर्वी.

निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी हे आपले भविष्याचे जीवन असल्याने पाण्याचा वापर दैनंदिन जीवनात जपून करावा. वसुंधरेच्या पोटातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने, आपल्याला पाणी मिळणार नाही. त्यासाठी जलपुनर्भरण शोषखड्यात जिरवून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- उमेश आसटकर, आर्वी पर्यावरण अभ्यासक.

टॅग्स :wardha-acवर्धाwater shortageपाणीकपात