शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

हुकूमशाहीकडे जाणारा देश वाचविण्याची जबाबदारी नागरिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:19 IST

देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला.

ठळक मुद्देकुमार केतकर : ‘गांधी समजून घेताना’वर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील संविधानिक संस्था नष्ट करून या देशात हुकुमशाही राजवट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तसेच जागतिक पातळीवरील अलीप्त राष्ट्र परिषदेतून भारत बाहेर पडला. २०१९ नंतर जर पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत, तर या देशात नथ्थुराम गोडसेंना राष्ट्रपिता म्हणून गौरविल्या जाईल, अशी भीती ज्येष्ठ संपादक व राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली.गांधी फॉर फ्युचर व सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी समजून घेताना’ या विषयावर गांधी विचार व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून प्रियदर्शनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या. यावेळी चरखा, खादीची शाल व सूतमाळ देवून खा. केतकर त्यांचा स्वागताध्यक्षांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित फाळके पाटील यांनी केले. यात त्यांनी आपण कारंजासारख्या लहानश्या गावातून शिक्षण घेवून देश-विदेशात विविध ठिकाणी फिरलो. अनेक लोकांशी संवाद साधला. परंतु, कुठेतरी नंतर आपल्याला गावाकडे परतण्याची इच्छा निर्माण झाली. यामागे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रेरणा व विचार कारणीभूत होते, असे त्यांनी सांगितले.व्याख्यानात खा. कुमार केतकर म्हणाले, गांधी समजून घेण्याची गरज जगापेक्षा भारताला अधिक निर्माण झाली आहे. कारण गांधी समजून घेवून जगातील विविध देश विकासाकडे पुढे जात आहे. आपल्या देशात आजही नथ्थुराम गोडसेंच्या विचारांचे गुणगाण गाणारे लोक कायम आहे. महात्मा गांधी यांचा मृत्यू होवून ७० वर्षे झालीत. परंतु, अजूनही या महात्म्याची भीती सत्ताधारी पक्षासह गांधी विरोधकांमध्ये कायम आहे. त्यामुळे ते नेहमी सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करून गांधींची आठवण करीत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इंग्रजांनाही प्रचंड भीती होती. नि:शस्त्र असलेला हा माणूस इंग्रजांना तेव्हाही भारी पडला होता. जगातील ५६ ठिकाणी इंग्रजांची राजवट होती. मात्र, तेथे होणारे लढे हे शस्त्राने व्हायचे, ते परतुन लावण्याची ताकत त्यांच्यामध्ये होती; पण भारतातील गांधींच्या नेतृत्वातील लढे हे नि:शस्त्र असल्याने इंग्रज गोंधळून जायचे, असे त्यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू यांच्याशी गांधीजींचे अनेक मुद्यांवर मतभेद असले तरी त्यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय गांधींनीच घेतला होता, असा दावाही केतकरांनी केला. आगामी काळात भारतात निवडणुकांमध्ये कोणता पक्ष, कोणते सरकार येईल हे सांगणे कठीण असले तरी या देशात हुकुमशाही राजवट निर्माण होवू शकते, त्यामुळे नागरिकांनी सजग राहून मतदान करण्याची गरज आहे, असे खा. केतकर यावेळी म्हणाले. महात्मा गांधी हयात असताना त्यांची टिंगल-टवाळी तेव्हाही झाली होती. आज सोशल मिडियावर ती केली जात आहे. ही नवी गोष्टी नाही, असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार मुरलीधर बेलखोडे यांनी मानले. कार्यक्रमाला सुमन बंग, डॉ. उल्हास जाजू, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, ज्ञानेश वाकुडकर, प्रशांत देशमुख, भूमीपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, प्रवीण काटकर, रितेश घोगरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, मनोज चांदुरकर, प्रा. किशोर वानखेडे, डॉ. सचिन पावडे, रवी बालपांडे, नितीन झाडे, गंगाधर मुटे, तुषार पेंढारकर, पंकज वंजारे, अमोल देशमुख, मोहित सहारे, यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्तीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.