शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बावनकुळेंची दुसऱ्यांदा फजिती; माईक पुढे करताच महिलेनं सांगितली महागाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 12:29 IST

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे.

वर्धा - भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यावेळी, जनतेच्या मनातील भावी पंतप्रधान कोण, हे जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करतात. भाजपाच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेनिमित्ताने चंद्रशेखर बावनकुळेवर्धा जिल्ह्यात होते. येथील स्थानिकांशी संवाद साधताना, त्यांनी पुन्हा एकदा २०२४ साली कोण पंतप्रधान व्हावं असा प्रश्न एका महिलेला विचारला. त्यावेळी, महिलेच्या उत्तराने बावनकुळे यांची दुसऱ्यांदा फजिती झाली.

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री जनतेत मिसळून लोकसंपर्कातून मोदींचा प्रचार करत आहेत. त्यासाठी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत लोकांच्या मनातील भावना जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी, एका तरुणाला बावनकुळेंनी २०२४ च्या पंतप्रधानाबद्दलचा प्रश्न विचारला होता. त्यावर, राहुल गांधी हे उत्तर दिल्याने प्रदेशाध्यक्षांची पंचायत झाली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात अशीच फजिती बावनकुळेंची झाली आहे.  

वर्धा शहरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या यात्रेदरम्यान महिलांना २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यावर वर्ध्यातील महिलेने महागाईवरुन संताप व्यक्त केला. महिलेची भावना लक्षात येताच बावनकुळे यांनी महिलेसमोर धरलेला माईक खाली घेतला. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महिलेने वाढत्या महागाईवर भाष्य करत संताप व्यक्त केल्याचं दिसून येते. सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलेंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का?, असा थेट सवाल महिलेनं यावेळी विचारला. त्यावर, आपण स्टेजवर बोलू, तुम्ही स्टेजवर चला, असे म्हणत बावनकुळे यांनी प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. 

रत्नागिरीतही तरुणाने दिले वेगळेच उत्तर

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्यभर दौरे करत असून भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. रत्नागिरीमध्येही त्यांनी रस्त्यावर उतरुन जनतेशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी, काहींना आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होईल, असा प्रश्न केला. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान कोण व्हावं, असं तुम्हाल वाटतं, असा सवाल बावनकुळे यांनी केला होता. त्यावर, एका युवकाने राहुल गांधींचं नाव घेतलं. तरुणाने राहुल गांधींचं नाव घेतल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले. त्यावेळी, त्यांनी शांतपणे प्रतिक्रिया देत, ४५० पैकी एकजण राहुल गांधींच्या पसंतीचा आहे, असे म्हणत त्या युवकाचे धन्यवाद मानले. मात्र, या तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला होता. 

 

टॅग्स :BJPभाजपाInflationमहागाईChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेwardha-acवर्धा