शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

स्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:28 AM

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही.

ठळक मुद्देसुबोध मोहिते यांची माहिती : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे शासन असल्याने त्यांना त्यांची जागा शेतकरी दाखवून देणार? आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई असून २० आॅक्टोंबरला शेतकरी व कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी दिली.येथील विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गौरव वाघ, विश्वनाथ मस्के, समीर घोडे, आर्वी तळेगाव, आष्टी, कारंजा, रोहणा, खरांगणा जळगाव पिंपळखुटा आदी अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्यावी ,सोयाबीन कापूस, तुरीच्या हमीभावाची खरेदी केंद्र सुरू करा, बोंड अळीचे अनुदान हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अदा करा ,वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, आधी मागणीसाठी सदर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य दादा गाडगे यांचा सुबोध मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद सर्कलपदी दिलीप रेवतकर तर सिंधी विहिरी जिल्हा परिषद सर्कल पदी गोपाळ नासरे यांची नियुक्ती करण्यात आली.या सभेत भाजप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुबोध मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी स्वाभिमानी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी मोहिते यांनी संवाद साधला.

टॅग्स :Subodh Mohiteसुबोध मोहितेChakka jamचक्काजाम