शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कापूस लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सीसीआय ग्रेडरची दांडी; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:11 IST

Wardha : कापसाची आवकही कमी, भावबाजीतही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : देवळीच्या कापूस लिलाव प्रक्रियेत सीसीआय ग्रेडरचा सहभाग राहत नसल्याने याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारच्या तारखेपर्यंत देवळीच्या बाजारात ४६ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यामध्ये सीसीआयची खरेदी नाममात्र ९ हजार क्विंटलपर्यंत झाली आहे. 

यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असून भावबाजीचा सुद्धा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे. अशावेळी सीसीआयची खरेदी पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यात येत आहे. देवळी केंद्रावर सीसीआयचे अधिकृत ग्रेडर म्हणून चंद्रकांत हिवसे कार्यरत असून त्यांचेकडे वर्धा, वायगाव, आमला, उमरी व शिरपूर आदी ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे सर्व केंद्रावर ऐकाच वेळी काम करणे शक्य नसल्याने हिवसे यांच्या अनुपस्थितीत कर्मचारी ग्रेडिंग करीत आहे. परंतु या ग्रेडींगदरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये हुज्जत होतांना दिसत आहे. देवळीच्या बाजार समितीत रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीसीआयच्या कापूस खरेदीची तसेच ग्रेडिंगची प्रक्रिया स्थानिक नरसाई जिनिंगमध्ये राबविली जात आहे. सोबतच कापसाचा ओलावा तपासून प्रतिक्विंटल ७ हजार ५२१ पर्यंत भाव दिला जात आहे. सीसीआयच्या तुलनेत आठ दिवसापूर्वी खासगी व्यापाऱ्यांचे भाव सुद्धा प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० पर्यंत होते. परंतु सध्या हे भाव ७ हजार १०० ते ७ हजार २०० पर्यंत खाली आले आहे. सीसीआयचे अधिकारी लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने खासगी व्यापारी याचा फायदा घेत आहे. त्यामुळे कापसाच्या भावबाजीत तेजी राहण्यासाठी, खुल्या लिलावात सीसीआयचे असणे आवश्यक झाले आहे. 

कापसाची उलंगवाडीकडे वाटचाल या हंगामात कापसाचे उत्पादन अतिशय कमी असून, परिसरातील कापसाची शेती उलंगवाडीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने दोन वेच्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच यवतमाळ, राळेगाव व आजूबाजूच्या परिसरात सीसीआयचा विस्तार वाढल्याने देवळीच्या केंद्रावर बाहेरून येणारी कापसाची आवक घटली आहे. त्यामुळे या केंद्रावरील दरवर्षीचा साडेपाच ते सहा लाख क्विंटल पर्यंतच्या खरेदीचा आकडा खाली येणार असल्याचे बोलले जात आहे

सीसीआयकडून आठ दिवसाच्या फरकाचा मिळतो धनादेश...सीसीआयच्या वतीने आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठ दिवसाच्या फरकाने कापसाचे चुकारे वळते केले जात आहे. तर खासगी व्यापारी तीन दिवसांच्या फरकाने कापसाचे धनादेश देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून सीसीआयच्या आसपासच भाव मिळत आहे व चुकारेही सीसीआयपेक्षा लवकर मिळत असल्याने शेतकरीही आपले हित जोपासत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरी