शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

कापूस लिलावाच्या प्रक्रियेमध्ये सीसीआय ग्रेडरची दांडी; शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:11 IST

Wardha : कापसाची आवकही कमी, भावबाजीतही फटका

लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : देवळीच्या कापूस लिलाव प्रक्रियेत सीसीआय ग्रेडरचा सहभाग राहत नसल्याने याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारच्या तारखेपर्यंत देवळीच्या बाजारात ४६ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यामध्ये सीसीआयची खरेदी नाममात्र ९ हजार क्विंटलपर्यंत झाली आहे. 

यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असून भावबाजीचा सुद्धा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे. अशावेळी सीसीआयची खरेदी पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यात येत आहे. देवळी केंद्रावर सीसीआयचे अधिकृत ग्रेडर म्हणून चंद्रकांत हिवसे कार्यरत असून त्यांचेकडे वर्धा, वायगाव, आमला, उमरी व शिरपूर आदी ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे सर्व केंद्रावर ऐकाच वेळी काम करणे शक्य नसल्याने हिवसे यांच्या अनुपस्थितीत कर्मचारी ग्रेडिंग करीत आहे. परंतु या ग्रेडींगदरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये हुज्जत होतांना दिसत आहे. देवळीच्या बाजार समितीत रजिस्ट्रेशन केल्यानंतर सीसीआयच्या कापूस खरेदीची तसेच ग्रेडिंगची प्रक्रिया स्थानिक नरसाई जिनिंगमध्ये राबविली जात आहे. सोबतच कापसाचा ओलावा तपासून प्रतिक्विंटल ७ हजार ५२१ पर्यंत भाव दिला जात आहे. सीसीआयच्या तुलनेत आठ दिवसापूर्वी खासगी व्यापाऱ्यांचे भाव सुद्धा प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० पर्यंत होते. परंतु सध्या हे भाव ७ हजार १०० ते ७ हजार २०० पर्यंत खाली आले आहे. सीसीआयचे अधिकारी लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने खासगी व्यापारी याचा फायदा घेत आहे. त्यामुळे कापसाच्या भावबाजीत तेजी राहण्यासाठी, खुल्या लिलावात सीसीआयचे असणे आवश्यक झाले आहे. 

कापसाची उलंगवाडीकडे वाटचाल या हंगामात कापसाचे उत्पादन अतिशय कमी असून, परिसरातील कापसाची शेती उलंगवाडीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने दोन वेच्यातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच यवतमाळ, राळेगाव व आजूबाजूच्या परिसरात सीसीआयचा विस्तार वाढल्याने देवळीच्या केंद्रावर बाहेरून येणारी कापसाची आवक घटली आहे. त्यामुळे या केंद्रावरील दरवर्षीचा साडेपाच ते सहा लाख क्विंटल पर्यंतच्या खरेदीचा आकडा खाली येणार असल्याचे बोलले जात आहे

सीसीआयकडून आठ दिवसाच्या फरकाचा मिळतो धनादेश...सीसीआयच्या वतीने आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठ दिवसाच्या फरकाने कापसाचे चुकारे वळते केले जात आहे. तर खासगी व्यापारी तीन दिवसांच्या फरकाने कापसाचे धनादेश देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून सीसीआयच्या आसपासच भाव मिळत आहे व चुकारेही सीसीआयपेक्षा लवकर मिळत असल्याने शेतकरीही आपले हित जोपासत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :cottonकापूसwardha-acवर्धाFarmerशेतकरी